जाळ्यात कसे ओढले?
सायबर चोरट्यांनी वकिलाच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत प्रचंड नफा मिळेल, असे आमिष दाखवले. वकिलाचा विश्वास संपादन करण्यासाठी चोरट्यांनी त्यांना बनावट 'प्रॉफिट'चे मेसेज आणि आकडेवारी पाठवून जाळ्यात ओढले. या आमिषाला बळी पडून वकिलांनी वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा केले.
परताव्याचा केवळ 'भास'
advertisement
वकिलांनी पैसे जमा केल्यानंतर, त्यांना मोबाईलवर परतावा मिळाल्याचे बनावट संदेश येत होते. मात्र, प्रत्यक्षात ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात कधीच जमा झाली नाही. जेव्हा वकिलांनी मूळ रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना तांत्रिक अडचणी सांगण्यात आल्या. संशय आल्यावर त्यांनी चोरट्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, तो बंद असल्याचे आढळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सायबर पोलिसांचा तपास सुरू
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. सुशिक्षित आणि कायदेतज्ज्ञ असलेल्या व्यक्तीची अशा प्रकारे फसवणूक झाल्याने "उच्चशिक्षित पुणेकर हव्यासापोटी सायबर जाळ्यात का अडकतात?" असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
