नेमकी घटना काय?
मयत तरुणांची नावे ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे अशी आहेत. हे दोघेही शिवभक्त विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन स्वतःच्या गावी, म्हणजे शिंदेवाडीला पायी निघाले होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव जवळ गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हे दोघे ज्योत घेऊन मार्गस्थ होते. त्याचवेळी, विरुद्ध दिशेने आलेल्या एका भरधाव कारने नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजक (Divider) भेदले आणि थेट या शिवभक्तांना चिरडले. हा आघात इतका भीषण होता की, ओंकार आणि दर्शन यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
शिवजयंतीच्या दिवशीच काळाचा घाला
ज्या उत्साहात हे तरुण 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष करत निघाले होते, तो आनंद काही क्षणातच दुर्घटनेत बदलला. हातातली शिवज्योत घेऊन गावाकडे पोहचण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. या दुर्घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, मावळचे सुपुत्र गमावल्याचे दु:ख संपूर्ण गावाला झाले आहे. पोलिसांकडून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित कारचालकावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
