TRENDING:

लाखो प्रवाशांची होणार गैरसोय! पिंपरी ते निगडी मेट्रोच्या कामासाठी हे महत्त्वाचं बसस्थानक हटवणार? पीएमपी आणि पोलीस आमनेसामने

Last Updated:

पुणे मेट्रोच्या पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गाचे काम आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. मात्र, अशातच आता निगडीतील ऐतिहासिक लोकमान्य टिळक चौक बसस्थानक हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पिंपरी-चिंचवड : पुणे मेट्रोच्या पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गाचे काम आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. मात्र, अशातच आता निगडीतील ऐतिहासिक लोकमान्य टिळक चौक बसस्थानक हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाहतूक कोंडीचे कारण देत निगडी वाहतूक विभागाने हे स्थानक हलवण्याची मागणी केली आहे. मात्र, या निर्णयामुळे दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे दोन लाख प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
निगडीतील ऐतिहासिक लोकमान्य टिळक चौक बसस्थानक हटवण्याच्या हालचाली सुरू
निगडीतील ऐतिहासिक लोकमान्य टिळक चौक बसस्थानक हटवण्याच्या हालचाली सुरू
advertisement

प्रकरण काय?

पिंपरी ते निगडी या ४.५१ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे ५४ टक्के काम पूर्ण झाले आहे. टिळक चौकात मेट्रोच्या खांबांचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला असून भीषण वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीता गायकवाड यांनी हे बसस्थानक तात्पुरते हटवण्याचे पत्र पीएमपी प्रशासनाला दिले आहे. बसगाड्या भक्ती-शक्ती ते आकुर्डी खंडोबा माळ मार्गावरून वळवण्याचा वाहतूक पोलिसांचा घाट आहे.

advertisement

प्रवाशांची होणार मोठी पायपीट

हे स्थानक १९८२ पासून सुरू असून येथून लोणावळा, हिंजवडी, मावळ आणि पिंपळे गुरव अशा विविध भागांत जाणाऱ्या २४ हून अधिक बस सुटतात. जर हा थांबा हटवला, तर प्रवाशांना भक्ती-शक्ती किंवा खंडोबा माळ चौकापर्यंत ३ किलोमीटरची पायपीट करावी लागेल. यामुळे २० हजार विद्यार्थी, ५० हजार ज्येष्ठ नागरिक आणि ६० हजार महिलांची मोठी गैरसोय होईल. तसंच प्रवासाचा वेळ वाढण्यासोबतच तिकीट दरातही १० ते २० रुपयांची वाढ सोसावी लागेल.

advertisement

पीएमपी प्रशासनाचा ठाम नकार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याला भाव नाहीच, केळीची काय स्थिती? Video
सर्व पहा

वाहतूक पोलिसांच्या या मागणीला पीएमपी प्रशासनाने स्पष्ट विरोध दर्शवला आहे. "मुख्य रस्त्यावर दर एक किलोमीटरला बसथांबा असणे गरजेचे आहे. भक्ती-शक्ती आणि आकुर्डी चौक यातील अंतर जास्त असल्याने हे स्थानक हटवणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही," असे पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी किरण चौहान यांनी स्पष्ट केले आहे. आता मेट्रोच्या कामासाठी प्रवाशांना वेठीस धरले जाणार की प्रशासन सुवर्णमध्य काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
लाखो प्रवाशांची होणार गैरसोय! पिंपरी ते निगडी मेट्रोच्या कामासाठी हे महत्त्वाचं बसस्थानक हटवणार? पीएमपी आणि पोलीस आमनेसामने
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल