मुक्ताईंच्या या पायी दिंडीची सुरुवात तब्बल सव्वा तीनशे वर्षे झाली आहेत. तब्बल दीड ते 2000 वारकरी या पायी दिंडीमध्ये सहभागी होतात. मुक्ताईनगर, बुलढाणा, जालना मार्गे ही दिंडी पंढरपूरला मार्गस्थ होते. साडेपाचशे ते सहाशे किलोमीटरचा पायी प्रवास दिंडीतील वारकरी करतात. 29 दिवस पायी प्रवास केल्यानंतर आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी ही दिंडी पंढरपूरमध्ये पोहोचते. संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण संत मुक्ताई यांच्या पादुका जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे नेल्या जातात. टाळमृदंगाच्या गजरात आणि अभंग, ओव्या, भजन, कीर्तन करत वारकरी मोठ्या उत्साहात या दिंडी सोहळ्यात सहभागी होतात.
advertisement
shravan month 2025: श्रावण महिन्यात...! कधीपासून कुठंपर्यंत धार्मिक विधी, किती श्रावण सोमवार असतील?
आतापर्यंत 28 वेळा मी दिंडी सोहळ्यात सहभागी झालो आहे. 95 पासून दिंडीमध्ये सहभागी होतो आहे. माझं वय 78 वर्षे आहे. जगात सुखशांती नांदावी, कुठेही वाईट काही घडू नये अशी प्रार्थना मी विठ्ठलाला करणार आहे. संत विठ्ठल बळ देईल तोपर्यंत विठ्ठलाच्या चरणी जाण्याचा माझा प्रयत्न असेल, असं वयोवृद्ध आजोबा नारायण पाटील यांनी सांगितलं.
तर मध्य प्रदेशातील संजय सपकाळे हे देखील या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांना मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा ज्ञात आहेत. दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्याने आनंद मिळतो. कोणतीही अडचण नाही, सगळं आनंदात पार पडतंय. विठ्ठलाला भेटण्याची ओढ कोणताच त्रास जाणवू देत नाही, असं त्यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.





