सूर्यग्रहण संपल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी सूर्यग्रहणानंतर घर आणि देव्हाऱ्याशी संबंधित कोणते नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे, याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ.
ग्रहण संपल्यानंतर गंगाजलाचा उपाय - सूतक संपल्यानंतर लगेचच घरातील देव्हाऱ्यात गंगाजल शिंपडावे. इतकंच नाही तर देव्हाऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी गंगाजल शिंपडून स्वतःची शुद्धी करणेही अत्यंत आवश्यक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, गंगाजल शुद्ध असते आणि त्यावर कोणत्याही प्रकारच्या ग्रहणाचा प्रभाव पडत नाही, त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव दूर करण्यासाठी घराच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात गंगाजल शिंपडावे.
advertisement
या राशींना आठवडा अतिशय शुभ! आर्थिक लाभ, आवडीची सहल घडणार; साप्ताहिक राशीभविष्य
देव्हाऱ्यातील देवतांना स्नान - ग्रहणाचा कालावधी संपल्यानंतर देव्हाऱ्यातील प्रत्येक मूर्ती आणि फोटो स्वच्छ करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही लिंबू, दही, चंदन वापरू शकता. देव्हाऱ्यातील मूर्तींना कपडे घातले असतील तर ते बदलण्याची गरज आहे. सूतक काळात देवाला घातलेले कपडे पुन्हा देवाला घालू नयेत.
मंदिरातील भांड्यांची साफसफाई -
देवाची पूजा करता जी भांडी आपण वापरतो किंवा देव्हाऱ्यात ठेवलेली भांडी स्वच्छ करावीत. याशिवाय ग्रहण संपल्यानंतर मंदिर-देव्हाऱ्यांमध्ये ठेवलेला कलश, घंटा, गदा, त्रिशूळ, शंख इत्यादींची स्वच्छता करणे गरजेचे आहे. सूतक काळाच्या वेळी देव्हारा झाकण्यासाठी वापरलेले कापड देखील काढून टाकावे आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. तेथे नवीन कापड लावण्याची परंपरा आहे.
ते.
अतृप्त आत्मे मानवी शरीरात प्रवेश करतात? भूतडी अमावस्येला म्हणून करतात या गोष्टी
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
