1) ऋषी
‘ऋषी’ हा शब्द संस्कृतमधील “ऋष्” धातूपासून बनलेला असून त्याचा अर्थ आहे “पाहणारा” किंवा “जाणणारा”. ऋषी म्हणजे केवळ ज्ञानी नाही तर, त्यांनी अतींद्रिय स्थितीत वेदांचे मंत्र "श्रवण" केले. हे मंत्र विचारांनी नव्हे तर साक्षात्काराने त्यांच्या अंतरात्म्यात प्रकट झाले. वसिष्ठ, विश्वामित्र, अत्री यांसारख्या ऋषींनीच या दिव्य ज्ञानाचा प्रसार केला.
अनेक ऋषी गृहस्थ आश्रमात राहून यज्ञ, शिक्षण व सामाजिक सुधारणा करत असत. त्यांनी वेदाध्ययन, ध्यान, तप, आणि सामाजिक शिस्तीच्या माध्यमातून धर्म व संस्कृति टिकवली. भारतात आजही अनेक कुटुंबे स्वतःला ऋषींचे वंशज मानतात.
advertisement
ऋषी म्हणजे असे ज्ञानी, जे वेदांच्या गूढ अर्थांचे आकलन करून ते केवळ लोककल्याणासाठी प्रकट करतात. योगसामर्थ्याने त्यांना परमात्मा व जगताचे रहस्य समजते.
ऋषींचे प्रकार: अमरसिंह निर्मित संस्कृत कोशानुसार, ब्रह्मऋषी, देवऋषी, महार्षी, परमऋषी, कंदरषी, श्रुतर्षी, राजर्षी असे सात प्रकार सांगितले गेले आहेत.
सप्तर्षी: सप्तर्षी म्हणजे स्वर्गीय सप्त तारकांशी निगडित असलेले ऋषी – वसिष्ठ, अत्री, भृगु, अंगिरा, पुलस्त्य, पुलह व क्रतू. काही यादीत गौतम, विश्वामित्र, जमदग्नी, कश्यप, भारद्वाज यांचाही समावेश आहे.
2) मुनी
‘मुनी’ हा शब्द “मौन” या शब्दापासून तयार झाला आहे. मुनी म्हणजे तो जो शब्दांपासून निवृत्त होऊन, आत्ममौनात स्थिर राहतो. ते बहुधा समाजापासून दूर, ध्यान व अंतर्मनाच्या शोधात मग्न असतात.
सर्व ऋषी मुनी नसतात आणि सर्व मुनी ऋषीही नसतात. ऋषी समाजात कार्यरत असतात, तर मुनी अंतर्मुख, शांत आणि संन्यस्त असतात. लोमश मुनी, जडभरत यांसारखे महापुरुष या मार्गाचे प्रतिनिधी आहेत.
भगवद्गीतेत असा मुनी श्रेष्ठ मानला आहे जो सुख-दु:खात समभाव राखतो, राग-लोभाशिवाय असतो, आणि ज्याचे बुद्धीचे तेज निर्मळ आहे. काही मुनी मौनव्रती असतात, तर काही नामस्मरण आणि ध्यानात मग्न. नारद मुनी हे देवभक्तीचे सर्वोच्च उदाहरण मानले जातात.
3) साधू
‘साधू’ म्हणजे तो जो "साधना करतो" किंवा मोक्षप्राप्तीसाठी झटतो. त्यांचे जीवन त्याग, योग आणि भक्तीच्या मार्गावर आधारलेले असते. ते भगवे वस्त्र, जटा, कमीतकमी आवश्यकतांमध्ये जीवन, आणि भिक्षेवर आधारित उपजीविका असते. साधू समाजात फिरणारे,अज्ञेयाचे स्मरण करणारे, कधीही स्थिर न राहणारे आध्यात्मिक प्रवासी असतात. ते विद्वान नसले तरी त्याग व तपाच्या बळावर उच्च आध्यात्मिक स्थितीत पोहोचलेले असतात.
4) संत
‘संत’ हा शब्द जरी पाश्चात्य वाटला तरी भारतात त्याचा अर्थ सद्गुणी, भक्त, जनसामान्यांचा मार्गदर्शक असा आहे. संत कबीर, संत नामदेव, संत तुकाराम, श्रीरामकृष्ण परमहंस, माता अमृतानंदमयी हे काही प्रभावशाली संत होत.
संत हे भक्ती, सेवा, प्रेम आणि समर्पणाच्या मार्गावर जनतेचे प्रबोधन करतात. ते समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात – भेद मिटवतात, जातीधर्मापलीकडचा संदेश देतात. ते शिस्त, आचरण आणि शुद्ध विचारांनी लोकांचे जीवन उजळवतात. संत हे ऋषींपेक्षा सामाजिकदृष्ट्या सक्रिय, मुनींपेक्षा भावनात्मक, आणि साधूंपेक्षा अधिक करुणामय असतात. ते समाजासाठी दैवी कृपेचे माध्यम असतात.