पंचकात कोणत्या गोष्टी टाळाव्या - पंचकाच्या काळात लाकडाशी संबंधित कामं करणं अशुभ मानलं जातं. कोणत्याही प्रकारचं लाकडी फर्निचर, जसं की पलंग किंवा खाट बनवणं टाळायला हवं. घराचं छत टाकणं किंवा बांधकामाला सुरुवात करणंही अशुभ असतं. या काळात विवाह, गृहप्रवेश किंवा इतर कोणतेही मंगल कार्य करणं वर्जित आहे. याशिवाय, पंचकात दक्षिण दिशेला प्रवास करणं टाळावं, कारण ही यमाची दिशा मानली जाते. विशेषतः अग्नी पंचकात अवजारं, यंत्रसामग्री किंवा नवीन बांधकामाची सुरुवात करणं नुकसानदायक ठरू शकतं.
advertisement
'स्वतःमध्येच परिपूर्ण' महादेवाला का करावं लागलं लग्न? वैरागी शिवाचा विवाह कसा
पंचकात करता येण्यासारखे उपाय - पंचकात अनेक कामं निषिद्ध असली, तरी काही उपाय करून त्यातील नकारात्मक प्रभाव कमी करता येतो. जर काही कारणास्तव दक्षिण दिशेला प्रवास करणं गरजेचं असेल, तर निघण्यापूर्वी हनुमान चालीसा वाचा आणि प्रवासाची सुरुवात उत्तर दिशेला काही पावलं चालून करा. पंचकाच्या पाचही दिवसात भगवान शिव आणि विष्णूची नियमित पूजा करणं शुभ मानलं जातं. याशिवाय तुळशीचं पूजन करणंही सकारात्मक असतं. या काळात दानधर्म आणि पुण्यकर्म करणं खूप फायदेशीर ठरतं.
पंचक कसं ठरतं - पंचक हे फक्त पाच विशेष नक्षत्रांमध्येच येतं: धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती. या नक्षत्रांमध्ये शुभ कार्य करणं वर्जित मानलं जातं. या श्रेणीत धनिष्ठा हे पहिलं नक्षत्र आहे आणि रेवती हे शेवटचं. या नक्षत्रांच्या काळात ध्यान आणि पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होते.
जाणार एकदाची पिडा! 30 वर्षांनी शनिचा मेष राशीत प्रवेश, या राशींची साडेसाती सुटली
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याचा आम्ही दावा करत नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
