जेव्हा पांडवांनी राज्यात आपले हक्क मागायला सुरुवात केली, तेव्हा शकुनीने एक नवीन युक्ती खेळली. त्याने दुर्योधनाला चौसर म्हणजेच फाशाचा खेळ खेळण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला दुर्योधनला शकुनीच्या खेळाबद्दल शंका होती पण शकुनीने दुर्योधनला आश्वासन दिलं की त्याचे फासे त्याच्या सूचनांनुसार चालतात आणि म्हणूनच तो बुद्धिबळाचा खेळ नक्कीच जिंकेल. शकुनी आणि दुर्योधन यांनी अतिशय हुशारीने पांडवांना त्यांच्या जाळ्यात अडकवलं आणि एकामागून एक सर्वस्व पणाला लावलं.
advertisement
Mahabharat : 100 कौरव पण फक्त दुर्योधन, दुशासनच सगळ्यांना माहिती, इतर कौरवांची नावं काय?
महाभारताचे युद्ध झालं तेव्हा शकुनीचा सामना नकुल आणि सहदेवाशी झाला. कुरुक्षेत्राच्या या युद्धात नकुल आणि सहदेव यांच्याशी लढताना शकुनी त्याच्या तीन मुलांसह मारला गेला. युद्धाच्या अठराव्या दिवशी सहदेवाने शकुनीचा शिरच्छेद करून त्याचा वध केला. शकुनीच्या मृत्युनंतर दुर्योधनाने स्वतःचा जीव वाचवला आणि युद्धभूमीतून पळून गेला.
शकुनीचे फासे किती धोकादायक आहेत हे श्रीकृष्णाला माहीत होते. शकुनीच्या फाशामुळे समाजाचा पतन होऊ शकतो म्हणून भगवान श्रीकृष्णाने पांडवांना शकुनीच्या फासे नष्ट करण्यास सांगितले. भीमाला हे फासे नष्ट करायचे होते पण अर्जुनाने ती जबाबदारी स्वतःवर घेतली. अर्जुनाने श्रीकृष्णाने सांगितलेल्या अर्ध्या गोष्टी ऐकल्या आणि तो फासा घेऊन तो नष्ट करायला गेला. अर्जुनाने घाईघाईने हे फासे नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीत फेकून दिले. त्याला वाटलं की फासे जास्त काळ सोबत ठेवल्याने त्याच्यातही फसवणूक होऊ शकते, म्हणून त्याने लगेच फासे नदीत फेकून दिले.
Mahabharat : कर्णाला दररोज पडायचं एकच स्वप्न, दिसायची महिला, कोण होती ती?
शकुनीचा फासा नदीत टाकून अर्जुन हस्तिनापुरला परतला तेव्हा त्याने भगवान श्रीकृष्णाला तो फासा नदीत टाकल्याचं सांगितलं. अर्जुनाचे बोलणं ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, तू खूप मोठी चूक केली आहेस. शकुनीचे फासे भ्रामक होते. ते फक्त नदीत टाकून नष्ट करता येणार नव्हते. जर हे फासे कोणत्याही मानवाच्या हातात पडले तर समाजाचे पुन्हा अधोगती सुरू होईल.
असं मानलं जातं की नदीत तरंगताना हे फासे एखाद्या माणसाच्या हातात गेले आणि कलियुगात पुन्हा जुगार खेळ सुरू झाला. जुगारामुळे जग पुन्हा एकदा कपटाने भरले आणि जुगाराचा खेळ नवीन स्वरूपात खेळला जाऊ लागला.