TRENDING:

पहिल्या चंद्रग्रहणाला सुरुवात! गर्भवती महिलांनी करू नका 'या' चुका, अन्यथा होईल पश्चाताप

Last Updated:

आज फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण लागत आहे. दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श झाला असून, आता संपूर्ण भारतात ग्रहणाचे वेध आणि प्रभाव सुरू झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Chandra Grahan 2026 : आज फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण लागत आहे. दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श झाला असून, आता संपूर्ण भारतात ग्रहणाचे वेध आणि प्रभाव सुरू झाले आहेत. खगोलशास्त्रात ही एक सामान्य घटना असली, तरी भारतीय ज्योतिषशास्त्र आणि परंपरेनुसार, ग्रहण काळ हा विशेषतः गर्भवती महिलांसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. असे मानले जाते की, ग्रहण काळात वातावरणात उत्सर्जित होणारी नकारात्मक ऊर्जा आणि विशिष्ट किरणोत्सर्ग गर्भातील बाळावर विपरीत परिणाम करू शकतात. त्यामुळेच, गर्भवती महिलांनी आज सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत ग्रहण समाप्तीपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
News18
News18
advertisement

धारदार वस्तूंचा वापर टाळा

गर्भवती महिलांनी ग्रहण काळात सुरी, कात्री, सुई किंवा ब्लेड यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करू नये. जुन्या समजुतीनुसार, ग्रहण काळात अशा वस्तू वापरल्यास जन्माला येणाऱ्या बाळाच्या शरीरावर खुणा राहू शकतात किंवा काही शारीरिक दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या काळात भाजी चिरणे किंवा शिवणकाम करणे पूर्णपणे टाळावे.

advertisement

घराबाहेर पडणे टाळा

ग्रहण काळात चंद्राकडून येणारे किरण दूषित असतात, असे मानले जाते. गर्भवती महिलेने थेट ग्रहणाच्या प्रकाशात येऊ नये. जर बाहेर पडणे अनिवार्य असेल, तर स्वतःला पूर्णपणे झाकून घ्यावे, जेणेकरून किरण अंगाला स्पर्श करणार नाहीत.

झोपताना सरळ झोपावे

असे मानले जाते की ग्रहण काळात गर्भवती महिलेने हात-पाय दुमडून किंवा पोटावर झोपू नये. शक्य असल्यास या काळात झोपणे टाळावे, पण जर झोपायचे असेल तर शरीर ताठ आणि सरळ ठेवून झोपावे.

advertisement

अन्न आणि पाण्याचे सेवन

सूतक काळ लागल्यापासून अन्न ग्रहण करणे निषिद्ध मानले जाते. जर भूक लागलीच, तर आधीच तुळशीचे पान टाकून ठेवलेले अन्न किंवा पाणी घ्यावे. तुळशीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते, ज्यामुळे अन्न शुद्ध राहते.

टाळवाटाळवी आणि चिडचिड

ग्रहण काळात मानसिक स्थितीवर परिणाम होतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी वादावादी, चिडचिड किंवा रडणे टाळावे. याचा थेट परिणाम बाळाच्या स्वभाववर होऊ शकतो.

advertisement

शास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा मनाचा आणि गर्भाचा कारक मानला जातो. ग्रहणावेळी राहू-केतूचा प्रभाव वाढल्याने चंद्राची शक्ती क्षीण होते, ज्याचा परिणाम गर्भातील बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर होऊ शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर, ग्रहणावेळी वातावरणात काही बदल होतात, ज्यामुळे अन्नावर जिवाणूंचा प्रादुर्भाव जलद गतीने होऊ शकतो, म्हणूनच खाण्यापिण्याचे नियम पाळले जातात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
असं गाव जिथे फोडली जाते एकमेकांडी डोकी, रक्त निघालं तर मानता देवीचा प्रसाद!
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
पहिल्या चंद्रग्रहणाला सुरुवात! गर्भवती महिलांनी करू नका 'या' चुका, अन्यथा होईल पश्चाताप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल