लक्ष्मीप्राप्तीसाठी करा गुलाबाचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी
यासोबतच ते वानरांना हरभरे खायला घालायचे. लखनऊचे इतिहासकार दिवंगत डॉ. योगेश प्रवीण यांनी आपल्या लखनऊनामा या पुस्तकात या मंदिराचा उल्लेख केला आहे. नवाब वाजिद अली शाह या ठिकाणाचे वैभव पाहून प्रभावित झाले होते. त्यांनी या मंदिराचे सुशोभीकरण करून या मंदिरावर चांद लावला होता, जो आजही मंदिराच्या शिखरावर आहे, असा उल्लेख आहे.
advertisement
एवढेच नव्हे तर नवाब वाजिद अली शाह यांच्या बेगम यांनी बडे मंगल येथून भंडारा सुरू केला होता, जो दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या मंदिरात बजरंगबलीचे मुख उत्तरेकडे आहे. येथे दररोज शेकडो भाविक येतात. या मंदिराची प्रदक्षिणा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
1783 मध्ये बांधले होते मंदिर
या मंदिराचे महंत गोपालदास यांनी सांगितले की, हे मंदिर 1783 मध्ये बांधले गेले. ही देवता स्वयंभू आहे. येथे हनुमानजी बसलेले आहेत. एवढेच नाही तर बांधकाम सुरू असताना हनुमानजींनी येथील एका महंताला दर्शन दिले होते, तेव्हापासून ते सिद्धपीठ मानले जाते. भक्त विजय कुमार यांनी सांगितले की ते अनेक वर्षांपासून येथे येत आहेत आणि भगवान त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
करिअरमध्ये प्रगतीसाठी पाळा वास्तूचा हा नियम, मिळेल यश
मंदिर बंद करण्याची आणि उघडण्याची वेळ
हे मंदिर पहाटे 5:00 वाजता उघडते. दुपारी 12:00 वाजता बंद होते. नंतर संध्याकाळी 4:00 वाजता उघडते आणि रात्री 10:00 वाजता बंद होते. येथे आरती सकाळी 9.00 वाजता होते आणि रात्री 9.00 वाजता होते. हनुमानजी व्यतिरिक्त, प्रभु श्रीराम आणि सरस्वती मातेच्याही येथे मूर्ती आहेत. येथे ज्येष्ठ महंतांचा पुतळाही आहे. याशिवाय साईबाबा आणि नीम करोली बाबाही येथे विराजमान आहेत.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)