दुसऱ्या टी-20 नंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अनुभवी ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या ड्रेसिंग रूममध्ये गप्पा मारतान दिसत होता. यावेळी गंभीर चिडलेला दिसत होता, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पांड्या आणि गंभीर यांच्यात राडा झाला होता की काय? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.
advertisement
हार्दिक पांड्या आणि गौतम गंभीर यांच्यात गंभीर चर्चा सुरू होती. मॅचमध्ये काय चुकलं यावर दोघंही चर्चा करत असावेत, असं बोललं जातंय. त्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये नॉर्मल चर्चा सुरू होती. दोघांमध्ये कोणतीही बाचाबाची किंवा वाद नव्हता. गंभीरने आपलं मत हार्दिकसमोर मांडलं. त्यावर हार्दिकने देखील होकारार्थी मान हलवल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान, भारतीय टीमचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने दुखापतीमधून परतल्यानंतर टी-20 क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात केली, पण त्याला आपला फॉर्म लगेच दुसऱ्या मॅचमध्ये कायम ठेवता आला नाही. त्याचे शेवटचे 2 टी-20 मॅच एकदम उलट-सुलट राहिले. एका मॅचमध्ये त्याने तूफानी खेळ दाखवला, तर दुसऱ्या मॅचमध्ये तो रन करण्यासाठी संघर्ष करताना दिसला.
