शुभमन गिल हा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलची टीम इंडियामध्ये निवड झाली नाही, याबद्दल आपल्याला कोणताही पश्चात्ताप नाही आणि कुणासमोरही माझं कौशल्य सिद्ध करण्याचीही गरज नसल्याचा निशाणा शुभमन गिलने साधला आहे. शुभमन गिलचं हे थेट वक्तव्य नेमकं निवड समिती प्रमुख अजित आगरकर, कोच गौतम गंभीर का कर्णधार सूर्यकुमार यादवबद्दल आहे? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
advertisement
'मी सातत्याने रन करत आहे. मागच्या तीन ते चार आयपीएल हंगामात मी सर्वाधिक रन केल्या आहेत. बॅटर म्हणून मी चांगली कामगिरी करत आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीममध्ये निवड न झाल्याबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही. मला कुणालाही माझं कौशल्य सिद्ध करण्याची गरज नाही', अशी प्रतिक्रिया शुभमन गिलने दिली आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात गुजरात ट्रॉफी जिंकेल, असा विश्वासही गिलने व्यक्त केला आहे.
गिलला टीम इंडियातून डच्चू
आशिया कपवेळी शुभमन गिलचं भारताच्या टी-20 टीममध्ये कमबॅक झालं, एवढंच नाही तर अक्षर पटेलचं उपकर्णधारपद काढून गिलला देण्यात आलं आणि ओपनर असलेल्या संजूला मिडल ऑर्डरमध्ये टाकून गिलला ओपनिंगला संधी मिळाली, पण गिलला या संधीचं सोनं करता आलं नाही. अखेर टी-20 वर्ल्ड कपच्या आधी गिलला टीमबाहेर करून इशान किशनला संधी देण्यात आली आणि अक्षर पटेलला पुन्हा उपकर्णधार करण्यात आलं.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी धमाकेदार बॅटिंग केली, ज्यामुळे टीम इंडियाने लागोपाठ दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला. शेवटच्या तिन्ही सामन्यांमध्ये तीन अर्धशतकं करणाऱ्या संजू सॅमसनला टी-20 वर्ल्ड कपमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देऊनही गौरवण्यात आलं.
