इंग्लंडला हरवून भारताने फायनल गाठली
या विजयाच्या समीकरणाची मुळे 1983 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये दडलेली आहेत, जेव्हा पहिल्यांदा हे दोन दिग्गज संघ सेमी फायनलमध्ये भिडले होते. त्याकाळी बलाढ्य मानल्या जाणाऱ्या इंग्लंडला हरवून भारताने फायनल गाठली आणि पुढे वेस्ट इंडिजवर विजय मिळवून पहिल्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. तो विजय भारतीय क्रिकेटसाठी एक टर्निंग पॉईंट ठरला होता, ज्याने क्रिकेटचे भविष्य बदलले.
advertisement
IND vs ENG : आयसीसीचा एक नियम अन् एकही बॉल न खेळता टीम इंडिया फायनलमधून 'आऊट', पाहा कोणता?
41 व्या वर्षी पुन्हा तोच प्रसंग
बरोबर 41 वर्षांनंतर, 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा हाच योगायोग पाहायला मिळाला होता. सेमी फायनलमध्ये भारताने इंग्लंडला धूळ चारली आणि त्यानंतर फायनल जिंकून पुन्हा एकदा ट्रॉफीवर कब्जा केला. आता 2026 मध्ये 41 व्या वर्षी पुन्हा तोच प्रसंग उभा ठाकला असून, जर भारताने 5 मार्चला वानखेडेवर विजय मिळवला, तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊन भारत पुन्हा एकदा विश्वविजेता बनण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
जेतेपदाचं स्वप्न भंगवलं
मात्र, हा रस्ता तितकासा सोपा नाही, कारण आयसीसी टूर्नामेंट्समध्ये आतापर्यंत या दोन्ही टीम्स 5 व्या वेळी आमनेसामने येत आहेत आणि विजयाचे पारडे 2-2 असे बरोबरीत आहे. 1987 आणि 2022 च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये इंग्लंडने भारताचा पराभव करून जेतेपदाचे स्वप्न भंगवले होते. त्यामुळे या 5 व्या लढतीत जो जिंकेल, तो केवळ फायनलमध्येच जाणार नाही, तर या द्वंद्वात आपली आघाडी देखील मजबूत करेल.
