18 बॉलमध्ये 45 धावांची गरज
17 व्या ओव्हरपर्यंत 209 धावा इंग्लंडच्या झाल्या होत्या. विजयासाठी त्यांना 18 बॉलमध्ये 45 धावांची गरज होती. मुंबईच्या बॅटिंग पीचवर इंग्लंडसाठी हे काम सोपं होतं. त्यात इंग्लंडचा 22 वर्षाचा जेकॉब बेथल मैदानात पाय रोवून थांबला होता. तर कॅप्टन सूर्यासमोर मोठं आव्हान होतं, ओव्हर कुणाला द्यायची. सूर्याने मोठा निर्णय घेतला अन् आपला हुकमी एक्का बाहेर काढला. तो म्हणजे जसप्रीत बुमराह... बुमराहने पहिल्या तीन ओव्हरमध्ये कमालीची बॉलिंग केली होती. जिथं सर्वजण 15 ते 20 रन्स ओव्हरला देत होते. तिथं बुमराह फक्त 8 च्या इकोनॉमीने बॉलिंग करत होता. सूर्याने इथंच डाव खेळला.
advertisement
बुमराहने यॉर्करवर यॉकर टाकले
सूर्याने 18 वी ओव्हर बुमराहला सोपवलं. टीम इंडियाचा हा डाव भारी पडणार का? असा सवाल विचारला जात होता. पण सूर्याला आपल्या रणनितीवर पूर्ण विश्वास होता. सूर्याने फिल्डिंग सेट केली अन् बुमराहने देखील प्लॅन आखला. विकेट घ्यायला जायचं नाही. बुमराहने फक्त यॉर्करवर यॉकर टाकले अन् 18 व्या ओव्हरला फक्त 6 रन्स दिल्या आणि इथंच मॅच फिरली. आता इंग्लंडला दोन ओव्हरमध्ये 39 धावांची गरज होती अन् टीम इंडियाचं काम सोपं झालं.
हार्दिक पांड्याने कमाल केली
दरम्यान, 19 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने देखील कमाल केली. पांड्याने ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर सॅम करनची विकेट घेतली अन् ओव्हरला फक्त 9 रन्स दिल्या. पांड्याने या ओव्हरमध्ये इंग्लंडवर प्रेशर तयार केलं. ज्याचा फायदा टीम इंडियाला झाला. त्यानंतर 20 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर टीम इंडियाचा विजय निश्चित झाला होता.
