तब्बल 13 कॅच सोडले
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाने सेमीफायनल गाठली असली, तरी मैदानावर टीम इंडियाची फिल्डिंग मात्र अतिशय चिंतेची बाब ठरली आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत तब्बल 13 कॅच सोडले असून, कोणत्याही संघाकडून झालेले हे सर्वाधिक ड्रॉप कॅच आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या सुपर 8 मॅचमध्येही भारतीय फिल्डर्सनी 3 महत्त्वाचे कॅच सोडले, ज्याचा फटका टीमला बसू शकला असता.
advertisement
टीम इंडियाची फिल्डिंग चिंतेचा विषय
आकडेवारीवर नजर टाकल्यास, भारताची कॅचिंग इफिशियन्सी अवघी 71.7% इतकी आहे, जी सुपर 8 मध्ये पोहोचलेल्या सर्व संघांमध्ये सर्वात निचांकी आहे. याचाच अर्थ, भारतीय खेळाडू प्रत्येक 10 कॅचपैकी साधारण 3 संधी गमावत आहेत. साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये तर भारतीय खेळाडूंनी 4 वेळा बॉल हातातून निसटू दिला होता, ज्यामुळे फिल्डिंग कोचवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पाकिस्तानची फिल्डिंग टीम इंडियापेक्षा चांगली
यंदाच्या वर्ल्ड कपमधून पाकिस्तान बाहेर पडली आहे. पाकिस्तानची फिल्डिंग जगात जोकचा मुद्दा असला तरी यंदा पाकिस्तानने चांगली कामगिरी केली होती. पाकिस्तानने 83.3% ची पकडण्याची टक्केवारी होती. ही कामगिरी भारताच्या तुलनेत खूप चांगली आहे. पाकिस्तानने फक्त 5 कॅच सोडले होते. अशातच टीम इंडियाला कामगिरी सुधारावी लागणार आहे.
इंग्लंडचं पारडं भारी
दरम्यान, दुसरीकडे, भारताचा सेमीफायनलमधील प्रतिस्पर्धी इंग्लंड हा संघ या स्पर्धेत सर्वात 'क्लिनिकल' फिल्डिंग साईड ठरली असून इंग्लंडची कॅचिंग इफिशियन्सी तब्बल 93.2% इतकी असून त्यांनी स्पर्धेत केवळ 3 कॅच सोडले आहेत. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध जर भारतीय फिल्डर्सनी कॅच सोडले तर त्यांच्या हातून मॅच निसटायला वेळ लागणार नाही, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 2024 मध्ये सूर्यकुमारचा एक लॉग ऑफचा कॅच गेमचेंजर ठरला होता. आता याचाच विसर टीम इंडियाला पडलाय.
