टीम इंडियाने दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सूरूवात खराब झाली होत. कारण जॉर्जिया वॉल 10 आणि बेथ मुनी 6 वर बाद झाली होती.त्यानंतर फोईब लिचफिल्डने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण ती 26 वर बाद झाली होती. त्याच्यानंतर एलीस पेरी 1 वर बाद झाली होती. ऑस्ट्रेलियाचे 63 धावांवर चार तीन विकेट पडले होते.
advertisement
त्याच्यानंतर अॅश्ले गार्डनर आणि जॉर्जिया वेरहाम मैदानात होती.यावेळी गार्डनरने एकाबाजूने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला होता. पण दुसऱ्या बाजूने विकेट पडत होते.गार्डनर जिथपर्यंच मैदानात होती तिथपर्यंत ऑस्ट्रेलिया सामना जिंकण्याची आशा होती.या दरम्यान तिने आपलं अर्धशतकही ठोकलं होतं. पण नंतर षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाऊन्ड्री लाईनवर जेमीमा रॉड्रीग्जने तिची जबरदस्त कॅच घेऊन तिला बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून एकट्या अॅशले गार्डनरने 57 धावा केल्या होत्या.गार्डनर बाद होताच विकेटची लाईनच लागली. शेवटी ऑस्ट्रेलिया 20 ओव्हरमध्ये फक्त 9 विकेट गमावून 159 धावाच करू शकली होती.त्यामुळे भारताने हा सामना 17 धावांनी जिंकला होता.
टीम इंडियाकडून श्री चरण, आणि श्रेयांका पाटीलने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या होत्या.तर अरूंधती रॉय 2 आणि रेणुका ठाकूरने एक विकेट घेतली होती.
भारताच्या डावाबद्दल बोलायचं झालं तर स्मृती मानधनाने 55 बॉलमध्ये 82 धावांची वादळी खेळी केली होती.या खेळीत तिने 3 षटकार आणि 8 चौकार मारले होते.त्याचसोबत जेमीमा रॉड्रीग्जने 59 धावांची खेळी केली होती.या खेळीच्या बळावर भारताने 6 विकेट गमावून 176 धावा केल्या होत्या.
दरम्यान टीम इंडियाची स्मृती मानधना आणि जेमीमा रॉड्रीग्जची अर्धशतकीय खेळी आणि श्रेयांका पाटीलच्या विकेट टेकींग गोलंदाजीमुळे टीम इंडियाने हा सामना जिंकला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेच 2-1 ने आघाडी घेत मालिका जिंकली आहे आणि ऑस्ट्रेलियाला घरात जाऊन हरवलं आहे.
