खरं तर 28 मार्च 2026 ला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर आयपीएलच्या 19 व्या सीझनचा पहिला मुकाबला हा सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातला हा पहिलाच सामना असल्याने ओपनिंग सेरेमनी हमखास होईल असे सर्वांना वाटत होते. पण यंदाच्या वर्षी ओपनिंग सेरेमनी होणार नाही आहे.त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.दरम्यान बीसीसीआयने अचानक ही ओपनिंग सेरेमनी रद्द का केली आहे? यामागचं नेमकं कारण काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
मागच्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलवर पहिल्यांदाच नाव कोरलं होतं.त्यामुळे आरसीबीने 28 मार्च 2025 ला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर व्हिक्ट्री परेड काढली होती. या व्हिक्ट्री परेडला इतकी गर्दी जमली होता की चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत 11 आरसीबी चाहत्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मागच्या वर्षी घडलेल्या या दु:खद घटनेमुळे आणि यंदाचा पहिला सामना देखील त्याच मैदानावर असल्याने बीसीसीआयने ओपनिंग सेरेमनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदा आयपीएलच्या हंगामाची सूरूवात ही ओपनिंग सेरेमनी विना होणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिली आहे. तसेच सैकीया यांनी यामागच कारणही सांगितलं आहे. 4 जूनला झालेल्या दु:खद घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.जेणेकरून मृतांना अशाप्रकारे श्रद्धांजली वाहता येईल,असे त्यांचे म्हणणे आहे. पण अद्याप यावर चर्चा सूरू आहे. तसेच स्पर्धेच्या शेवटी क्लोजिंग सेरेमनी आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे.यासोबत प्रत्येक सामन्याच्या वेन्यूवर कार्यक्रम करण्याचाही प्रस्ताव आहे. जेणेकरून चाहत्यांना आणखी उत्साह वाढेल.या सगळ्या प्रस्तावावर येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे.
