मिताली राजने सांगितले एखादा खेळाडू एका सामन्यात शतक झळकावतो, तर पुढच्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होऊ शकतो. खेळ आणि आयुष्य दोन्हीत यश आणि अडचणी येत-जात राहतात. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम राखणे आणि संघावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.
संघावर विश्वास ठेवणे आवश्यक
संघभावनेवर भर देताना मिताली राज म्हटले की एखाद्या खेळाडूसाठी आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खेळाडूची खरी ताकद तेव्हा दिसते जेव्हा तो चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात आपल्या संघाची साथ सोडत नाही. अशा वेळी संघावर विश्वास ठेवणे हीच सर्वात मोठी गोष्ट असते.
advertisement
मिताली राजची कारकीर्द
मिताली राजचा समावेश भारतातील दिग्गज महिला क्रिकेटपटूंमध्ये केला जातो. मितालीने भारतीय संघासाठी 12 कसोटी, 232 वनडे आणि 89 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये मितालीच्या नावावर 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 699 धावा आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये मितालीची कामगिरी विशेष उल्लेखनीय राहिली आहे. वनडेमध्ये भारतासाठी 7805 धावा केल्या असून 7 शतके आणि 64 अर्धशतके झळकावली आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मितालीने दमदार प्रदर्शन करत 2364 धावा केल्या आहेत. या प्रकारात तिच्या नावावर 17 अर्धशतके आहेत.
