पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने टी20 वर्ल्ड कप खेळण्याची तयारी दाखवली आहे, पण भारताविरूद्धच्या सामन्यात बहिष्कार टाकला आहे. पाकिस्तानने निव्वळ ही घोषणा सोशल मीडियावर केली होती.या संदर्भातील आपली अधिकृत भूमिका पत्राद्वारे आयसीसीला कळवणे आवश्यक होते.पण पाकिस्तानला अशाप्रकारे आपली भूमिका मांडण्याची गरज वाटत नसल्याची माहिती आहे. दरम्यान पाकिस्तानच्या या भूमिकेनंतर आयसीसी प्रचंड आक्रमक झाली होती आणि तिने गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा पाकिस्तानला दिला होता.
advertisement
आयसीसीच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची हालत खूपच वाईट झाली आहे. कारण पाकिस्तानने लगेचच आपल्या मित्र देशांना फोनाफोनी करायला सूरू केली होती. या फोनाफोनीमधून पाकिस्तानने भारताविरूद्ध घेतलेल्या बहिष्काराच्या भूमिकेवर इतर देशांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण जवळपास सगळ्याच देशांकडून त्यांना नकार कळवण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तान आपली भूमिका घेऊन एकटी पडली आहे, असे सुत्रांकडून बोलले जात आहे.
पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या देशांच्या क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधला यावेळी त्यांना अपेक्षित अशी उत्तर मिळाली नाही.याउलट सर्व देशांना असं वाटलं की पाकिस्तानने जाणून बुझून वाद हा काढला. बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी भारताविरूद्धचे सामने बॉयकॉट केले,अशी सुत्रांची माहिती आहे.त्यामुळे आता जर आयसीसीने सगळ्या देशाच्या क्रिकेट बोर्डाची बैठक बोलावली तर पाकिस्तान या बैठकीत एकटे पडणार आहे आणि त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
