भारताला ऑलिंपिकमध्ये पोहोचवण्यात मोठा वाटा
१९२० साली भारताने पहिल्यांदा अँटवर्प ऑलिंपिकमध्ये सहभाग घेतला होता. भारताला या स्पर्धेत पोहोचवण्यात दोराबजी टाटा यांची मुख्य भूमिका होती. १९१९ साली दोराबजी हे भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांनी मुंबईच्या राज्यपालांना भारतीय संघाला ऑलिंपिकमध्ये पाठवण्यासाठी तयार केले. १९२० साली भारतीय संघाला ऑलिंपिकला जाण्याची परवानगी मिळाली. या खेळाडूंना ऑलिंपिकमध्ये जाण्यासाठी लागणारा पैसा दोराबजी टाटा यांनी पुरवला होता. यावेळी भारताकडून पाच खेळाडूंना पाठवण्यात आले होते.
advertisement
Ratan Tata Death News LIVE: रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव
१९९६ मध्ये क्रिकेटमध्ये केली एन्ट्री
टाटा समूहाने क्रिकेटच्या उदयातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. १९९६ साली रतन टाटा यांनी पहिल्यांदा क्रिकेटच्या क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी 'टायटन कप' या नावाने त्रिकोणी मालिका प्रायोजित केली, ज्यात भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे देश सहभागी झाले. या मालिकेसाठी सचिन तेंडुलकर भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. या मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला. २००० साली मॅच फिक्सिंगचा आरोप झाल्याने रतन टाटा यांनी यातून माघार घेतली.
२०२० साली आयपीएलमध्ये घेतला सहभाग
२०२० साली टाटा समूहाने क्रिकेटमध्ये पुन्हा प्रवेश केला. यावेळी आयपीएल स्पर्धा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली होती. २०२० साली भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या राजकीय मतभेदांमुळे 'वीवो' फोन कंपनीने आयपीएल बरोबरची भागीदारी अर्ध्यातच रद्द केली. या काळात रतन टाटा यांनी जगातील सर्वांत मोठी लीग स्पॉन्सर करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर त्यांनी २०२३ साली सुरू झालेले महिला प्रीमियर लीगही स्पॉन्सर केले.