TRENDING:

'गेम फास्ट होत असेल तर...', सचिन तेंडूलकरचा आदल्या रात्री फोन अन् हरमनप्रीतने तिथंच फिरवली फायनल मॅच! काय म्हणाला क्रिकेटचा देव?

Last Updated:

Sachin Tendulkar Called Harmanpreet Kaur : वर्ल्ड कपच्या ऐतिहासिक फायनलच्या आदल्या रात्री भारतीय महिला टीमच्या कॅप्टनला एक खास फोन आला. या फोनने हरमनप्रीतचच नाही तर टीम इंडियाचं देखील भाग्य उजाळलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
World Cup Final : टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेवर वुमेन्स वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवला आहे. वुमेन्स टीम इंडियाने तब्बल 52 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरलं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अशक्य असे दोन विजय मिळवले अन् वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. अशातच आता टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीतने मोठा खुलासा केला आहे. सचिन तेंडूलकर याने हरमनप्रीतला एक सल्ला दिला होता, जो टीम इंडियाच्या कामी आला. त्यावरून हरमनप्रीतने मॅच फिरवली, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
Sachin Tendulkar Called Harmanpreet Kaur
Sachin Tendulkar Called Harmanpreet Kaur
advertisement

ऐतिहासिक फायनलच्या आदल्या रात्री...

भारतीय महिला टीम आपल्या पहिल्या वनडे वर्ल्ड कप किताब जिंकण्याचे स्वप्न घेऊन मैदानात उतरणार होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ऐतिहासिक फायनलच्या आदल्या रात्री भारतीय महिला टीमच्या कॅप्टनला एक खास फोन आला. या फोनने हरमनप्रीतचच नाही तर टीम इंडियाचं देखील भाग्य उजाळलं. हा फोन होता... थेट क्रिकेटच्या देवाचा... म्हणजेच सचिन रमेश तेंडूलकरचा.

advertisement

सचिन तेंडुलकरने फोन केला अन्...

हरमनप्रीतने आयसीसी रिव्ह्यूमध्ये सांगितले की, मॅचच्या आदल्या रात्री, सचिन तेंडुलकरने फोन केला. त्याने त्याचे अनुभव शेअर केले आणि आम्हाला संतुलन राखायला सांगितलं. जेव्हा खेळ वेगाने सुरू असतो, तेव्हा त्याला थोडे हळू करा. त्याला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा तुम्ही खूप वेगाने जाता, तेव्हा धडपडण्याची शक्यता असते. हेच आपल्याला होऊन द्यायचं नाही, असं सचिनने सांगितल्याचं हरमनप्रीत म्हणाली.

advertisement

लहानपणापासून मला भारतची जर्सी...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनच्या दराबद्दल नवी अपडेट, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

जेव्हाही आम्ही एकमेकींना पाहतो, तेव्हा आम्ही फक्त 'विश्व चॅम्पियन' म्हणतो. ही एक खूपच वेगळी भावना आहे. आम्हाला अशी भावना कधी येईल याची आम्ही वाट पाहत होतो, असं म्हणत हरमनप्रीतने आपल्या भावना व्यक्त केल्या. माझे आई-वडील तिथे होते. माझ्यासाठी, वर्ल्ड कपची ट्रॉफी त्यांच्यासोबत उंचावणे, हा खूप खास क्षण होता. लहानपणापासून त्यांनी मला भारतची जर्सी घालायची आहे, देशासाठी खेळायचे आहे, टीमचे नेतृत्व करायचे आहे आणि वर्ल्ड कप जिंकायचा आहे, हे मी ठरवलं होतं. ईमानदारीने सांगायचे तर, मी अजूनही याबद्दल विचार करू शकत नाहीये. कदाचित, काही महिन्यांनी मला कळेल की, आम्ही काय साध्य केले आहे, असं हरमनप्रीत कौर म्हणाली.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'गेम फास्ट होत असेल तर...', सचिन तेंडूलकरचा आदल्या रात्री फोन अन् हरमनप्रीतने तिथंच फिरवली फायनल मॅच! काय म्हणाला क्रिकेटचा देव?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल