खरं तर टी20 वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसन आऊट ऑफ फॉर्म होता. त्याच्या बॅटीतून धावाच निघत नव्हत्या.त्यामुळे सगळेच टेन्शनमध्ये संजूसोबत अभिषेक शर्माची देखील बॅट चालत नव्हती.त्यामुळे गंभीरने रिस्क घेऊन संजूला खेळवलं. आणि संजूने या संधीच सोन करत आपण काय लेव्हलचा खेळाडू आहे, हे दाखवून दिलं. विशेष म्हणजे टीम इंडियावर जेव्हा ग्रुप स्टेजमधून बाहेर होण्याच संकट होत,त्यावेळी संजूने वेस्ट इंडिजविरूद्ध 97 धावांची मॅचविनिंग खेळी केली होती.त्याच्या याच खेळीमुळे टीम इंडिया सेमी फायनलला गेली.
advertisement
त्यानंतर इंग्लंड विरूद्ध सेमी फायनल सामन्यातही 89 धावांची वादळी खेळी केली.या खेळीच्या भारताला इंग्लंड समोर 250 हून अधिक धावांचे लक्ष्य ठेवता आले. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड हारली.फायनल सामन्यात देखील संजूने 89 धावांची खेळी केली. यामुळे टीम इंडिया न्यूझीलंडसमोर 255 धावांचं लक्ष्य ठेवून होती.पण या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड 159 धावांवर ऑल आऊट झाली आणि भारताने 96 धावांनी सामान जिंकला होता.
दरम्यान या विजयानंतर संजू आज त्याच्या घरी पोहोचला होता. यावेळेस त्याच्यासोबत त्याची बायको होती. संजू यावेळी एअरपोर्टवर उतरताच त्याच्या बायकोचा चेहरा खुलला होता. यानंतर तिने पुढे येऊन संजू येतोय अशी माहिती चाहत्यांना दिली होती.त्यामुळे चाहते देखील आनंदीत झाले होते.
