झिम्बॉब्वे जवळपास स्पर्धेतून बाहेर
टीम इंडियाने उर्वरित दोन्ही सामने जिंकले, असं गृहित धरून चाललं तर... वेस्ट इंडिजने झिम्बॉब्वेला जवळपास स्पर्धेतून बाहेर केलंय, असं म्हणण्यास वाव आहे, आता एक टीम सेमीफायनलमधून बाहेर गेली. अशातच साऊथ अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यापैकी एका टीमचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे पराभूत टीमचा नेट रनरेट देखील कमी होईल. इथंच टीम इंडियाला संधी साधायची आहे.
advertisement
26 तारखेच्या मॅचवरून ठरणार टीम इंडियाचं भविष्य
जर वेस्ट इंडिजने साऊथ अफ्रिकेचा पराभव केला (जे शक्य नाही) तर साऊथ अफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यात ज्याचा नेट रनरेट चांगला असेल त्याला सेमीफायनलमध्ये संधी मिळेल. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा साऊथ अफ्रिकेकडून पराभव झाला. तर टीम इंडियाला नेट रनरेटने जिंकण्याची गरज पडणार नाही. 26 तारखेच्या मॅचवरून टीम इंडियाचं भविष्य ठरणार आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
टीम इंडियाला गाशा गुंडाळावा लागणार
दरम्यान, साऊथ अफ्रिकेचा वेस्ट इंडिजकडून अतितटीच्या लढतीत पराभव झाला तर टीम इंडियाला नक्कीच गाशा गुंडाळावा लागणार आहे. यामुळे वेस्ट इंडिजचा विजय टीम इंडियासाठी फायदाही ठरू शकतो आणि तोटाही... येत्या 26 फेब्रुवारीला टीम इंडियाच्या आगामी रणनितीचा विचार करावा लागणार आहे.
