भारताच्या या वर्ल्ड कप विजयानंतर स्टार स्पोर्टवर वैभव सूर्यवंशीच्या वडिलांशी बातचीत करण्यात आली. यावेळी वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी सांगितले की, वर्ल्डकप फायनलपूर्वी माझं वैभवशी बोलणं झालं होतं. त्याचं शतक होत नसल्याने तो प्रचंड उदास होता. यावेळी मी त्याला त्याच्या कामगिरी खूश आहे. त्याने वर्ल्ड कपमधील धावांनी देखील खूश आहे, असे सांगत त्याचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
advertisement
खरं तर वैभवने एकदा सांगितले होते की त्याच्या वडिलांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा आहे.मी कितीही धावा केल्या तरी ते संतुष्ट होत नाही.पण आज वडिलांच्या एका फोन कॉलने वैभवला दिलासा मिळाला आणि त्याने फायनल सामन्यात 80 बॉलमध्ये 175 धावांचा दीड शतकीय खेळी केली होती.या खेळी दरम्यान त्याने 15 चौकार आणि 15 षटकार मारले होते. याच त्याच्या वादळी खेळीमुळे भारत 411 धावांपर्यंत मजल मारू शकला होता. आणि नंतर इंग्लंडचा 100 धावांनी पराभव झाला. त्यामुळे वैभवला आलेल्या त्या वडिलांच्या एका फोन कॉलने मॅच फिरली होती.
तसेच जास्त षटकार आणि चौकार मारत असल्याने वडिलांनी त्याला एक-दोन धावा काढण्याचाही सल्ला दिला होता. पण जेव्हा षटकार मारल्यामुळे धावा निघतात मग सिंगल धाव घेऊन वेळ कशाला घालवू असे वैभव त्याच्या वडिलांना म्हणाला होता.
