घडले तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार ,नारपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ही विद्यार्थिनी इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. 1 मार्च रोजी ती बाथरूमला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली.
यानंतर नातेवाईक आणि कुटुंबीयांनी परिसरात तसेच ओळखीच्या ठिकाणी दिवसभर शोध घेतला. मात्र मुलीचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी रात्री उशिरा नारपोली पोलिस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
advertisement
दरम्यान या प्रकरणात मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले. शनिवारी (7 मार्च) रात्री अजमेरनगर ते नारपोली पोलिस ठाण्यापर्यंत कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांनी पायी मोर्चा काढला. या वेळी आरोपींना तात्काळ अटक करून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या घटनेमुळे भिवंडी परिसरात मोठी चर्चा सुरू असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
