नेमकं घडलं काय?
भूषण भानुशाली हे नेमहीप्राणे सकाळी घरातून पायी निघाले. दहा मिनिटांनी ते नौपाडा, बी केबिन येथील स्वामी समर्थ मठात पोहोचले. त्यानंतर त्यांच्याजवळ असणारी लॅपटॉपसह कागदपत्रांची बॅग त्यांनी शेजारी ठेवली आणि ते ध्यानस्त बसले. दहा मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले तेव्हा मठातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
थेट लोकवस्तीत घुसून हल्ला, बदलापुरात बिबट्याची दहशत, काय घडलं?
advertisement
मठातला वीजपुरवठा बंद झाल्यानंतर काही वेळात जनरेटरने वीजपुरवठा सुरू केला. तेव्हा भानुशाली यांना शेजारी ठेवलेली बॅग दिसली नाही. त्यांनी शोध सुरू केला. 20 हजारांचा लॅपटॉप, 200 रुपयांची बॅग, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक डेबिट कार्ड आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे असा ऐवज त्यांच्या बॅगेत होता. याप्रकरणी भानुशाली यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.






