पुलावर होत्याचं नव्हतं झालं
ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरातील दोन अल्पवयीन तरुणांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऋषिकेश राजेश जाधव आणि आयुष विजय जाधव अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण दिवा शहरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,ऋषिकेश आणि आयुष हे आपल्या काही मित्रांसोबत चार दुचाकींवरून फिरण्यासाठी बाहेर गेले होते. ते भिवंडी जवळील माणकोली पुलावरून जात असताना त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
ही बातमी कळताच त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. परिसरातील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली आहे. दोन्ही तरुण अविवाहित होते आणि शिक्षण घेत होते असे सांगितले जात आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
