
न्यूज18 लोकमतनं भांडाफोड केल्यानंतर, आता 9 पैकी 5 कैद्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. कित्येक दिवस डॅाक्टरांसोबत आर्थिक देवणघेवाण करून हे कैदी रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये तळ ठोकून होते.
Last Updated: May 22, 2024, 16:36 ISTछत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील अच्युतराव केसरकर यांचे वय 70 वर्षे आहे. पण अवघ्या तीन वर्षांपूर्वी, म्हणजेच वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे, शुद्ध तेल घाण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा. या वयात जिथे लोक निवृत्ती घेऊन आराम करण्याचा विचार करतात, तिथे अच्युतरावांनी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसली. तर त्यांच्या या प्रवासाविषयी माहिती पाहूयात
Last Updated: December 15, 2025, 13:25 ISTछत्रपती संभाजीनगर : आज वाढतं वजन अनेकांसाठी चिंता बनलं आहे. कामाचा ताण, अनियमित आहार आणि बसून राहण्याची सवय या सगळ्यांमुळे वजन नियंत्रणाबाहेर जातं. वजन कमी करण्यासाठी जिम, डाएटिंग अशा अनेक गोष्टी आपण करतो. पण कधी कधी आपल्या घरातील अगदी साध्या वस्तूंमध्येही प्रचंड आरोग्यदायी गुण लपलेले असतात. त्यापैकीच एक म्हणजे बडीशेप. जेवणानंतर तोंडाला सुगंध देण्यासाठी वापरली जाणारी ही छोटीशी दाणे असलेली बडीशेप, खरेतर संपूर्ण आरोग्यासाठी एक नैसर्गिक टॉनिक आहे. विशेषतः वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते.
Last Updated: December 13, 2025, 18:37 ISTमुंबई : वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण...आणि मुंबईचा वडापाव म्हणजे देश-विदेशातील खव्वयांसाठी पर्वणी. तुम्ही आजवर मुंबईत किंवा मुंबईबाहेर वेगवेगळ्या ठिकाणच्या वडापावची चव चाखली असेल. काही वडापाव भारी लागले असतील, काही वडापाव लय...भारी लागले असतील. पण तुम्ही कधी इडली वडापाव खाल्लाय का? असा वडापावपण असतो? पडला ना प्रश्न? होय, हा पदार्थ चवीला एकदम Yummy लागतो आणि तो तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं बनवू शकता.
Last Updated: December 13, 2025, 18:05 ISTपुणे : वडापाव आवडत नाही अशी व्यक्ती सापडणं अवघड आहे. वडापाव आवडतं नाही अशी व्यक्ती सापडणं मुश्किल आहे . वडापावचा जन्म मुंबईत झाला असला तरी संपूर्ण देशात हा पदार्थ तितकाच लोकप्रिय आहे. बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याच्या ऐवजी या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलान तळून बटाटेवडा बनवण्यास सुरूवात झाली. तेव्हापासून वडापाव हा प्रत्येकालाच आपला वाटतो.
Last Updated: December 13, 2025, 17:31 ISTछत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथे शिवाजी धोत्रे यांनी सुरू केलेले निसर्ग फार्म कृषी पर्यटन केंद्र सध्या पर्यटकांचे नवे आकर्षण ठरत आहे. दोन एकरांमध्ये उभारलेल्या या केंद्रावर हुरडा, रानमेवा, भेळ, तसेच चुलीवरचे जेवण अशा पारंपरिक स्वादांची खास सोय आहे. कुटुंबांसह येणाऱ्यांसाठी वेगळा किड्स झोन असल्याने दिवसभर येथे उत्साह पाहायला मिळतो. वाढती गर्दी आणि उत्तम व्यवस्थापनामुळे 30 स्थानिक कामगारांना रोजगार मिळाला आहे. या व्यवसायातून महिन्याला 15 लाखांची उलाढाल तर सुमारे 4 लाखांची निव्वळ कमाई होत असल्याचे शिवाजी धोत्रे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले आहे.
Last Updated: December 13, 2025, 17:05 IST