
चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्येही मोठी विविधता आहे. काही मैल अंतर पार केलं की त्यामधील वेगळेपण लक्षात येतं. विदर्भानंही स्वत:ची खाद्यसंस्कृती जपलीय. 'गोळा भात' हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशात चांगलाच फेमस आहे. हा गोळा भात कसा तयार होतो याची माहिती नागपूरचे दिग्गज मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी दिली आहे.
Last Updated: December 09, 2025, 18:05 ISTअमरावती : यावर्षी पावसामुळे संत्रा पिकाचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या संत्रा बागा देखील उद्ध्वस्त झाल्यात. आता जवळपास सर्वच शेतकऱ्यांची संत्रा बाग रिकामी झाली आहे. त्यामुळे आता झाडांची काळजी घेऊन आंबिया बहारासाठी झाडे तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आता संत्रा बागेचे नियोजन नेमकं कसं असावं? याबाबत माहिती कृषी मार्गदर्शक आणि प्रगतशील शेतकरी मयूर देशमुख यांनी दिली.
Last Updated: December 09, 2025, 17:50 ISTपुणे: पिंपरी- चिंचवड महानगरपालिका नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. त्यापैकीच एक उपक्रम सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. तो म्हणजे, नको ते द्या, हवे ते घेऊन जा हा उपक्रम ओंजळ फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे.
Last Updated: December 09, 2025, 16:55 ISTछत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड येथील एजास शेख यांचा वडिलोत्पार्जित म्हैस पालनाचा व्यवसाय आहे. मात्र हा व्यवसाय काही कारणास्तव काही काळाने बंद झाला होता. हिंम्मत न हारता आवड म्हणून गेल्या दोन वर्षांपासून एजास म्हैसपालन आणि दुग्ध व्यवसाय नियोजित पद्धतीने पुढे नेत आहे. सुरुवातीच्या काळात दोन म्हशी खरेदी केल्या त्यांच्यापासूनच या व्यवसायामध्ये वाढ होत गेली आणि आजच्या घडीला 7 म्हशी आहेत.
Last Updated: December 09, 2025, 16:32 ISTमुंबई: आजच्या काळात सोशल मिडिया हे सर्वात भक्कम माध्यम समजलं जातं. कारण, अनेक तरुणाई या प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव्ह असते आणि कोणत्याही विषयावर इथे पटकन आपली मत मांडता येतात किंवा आपला विचार लोकांपर्यंत सहज अवघ्या काही सेकंदात पोहोचवता येतो आणि हीच गोष्ट अनेक तरुण मनावर घेत वेगवेगळ्या विषयांवरील अनेक गोष्टी आहेत ज्या ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. असेच आता सोशल मीडियावर सकारात्मक बदल घडवणाऱ्या तरुणांमध्ये दादरचा मयुरेश गुजर हे नाव सध्या विशेष चर्चेत आहे. त्याने सुरू केलेली ‘पाप पुण्य का हिसाब’ ही सिरीज आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचली आहे, फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी नव्हे तर खऱ्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी ओळखली जाते.
Last Updated: December 09, 2025, 16:02 ISTजन्मापासून दारिद्र्य वाट्याला आलेल्या जालंदर लोकरे यांनी वयाच्या साठीमध्येही एका पंचवीशीतल्या तरूणाला मागे टाकले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या व्यवसायात त्यांनी वयाच्या साठीमध्ये, हार मानली नाही. राहायला घर नाही की दार. वडील धनगर असल्याने मेंढी पालन व्यवसाय करत त्यामुळे ते कुठेही जंगलात राहून दिवस लोटायचे. परंतु लोकरे जिद्दी आणि धाडसी ज्या वयात मुले शाळेत जातात त्याच वयात लोकरे त्या शाळेच्या बाहेर राहून चणे विकायचे.
Last Updated: December 09, 2025, 15:37 ISTहिवाळ्यात बाजारात भरपूर ताज्या भाज्या येतात, ज्यामध्ये गाजर आणि मुळा सर्वात जास्त प्रमाणात घेतले जातात. दोन्ही भाज्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने समृद्ध असतात, ज्यामुळे शरीर उबदार राहण्यासोबतच असंख्य पौष्टिक फायदे मिळतात. मात्र त्यांचे सेवन करताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण अयोग्य सेवन हानिकारक देखील असू शकते.
Last Updated: December 09, 2025, 14:37 ISTपुणे : पुलाव हा भाज्याचा वापर करून किंवा मग नॉन-व्हेजचा वापर करून बनवला जातो. मात्र आज आपण कोणतीही भाजी किंवा नॉन-व्हेज न वापरता, फक्त छोले आणि पनीरचा वापर करून एक खास पुलावची रेसिपी बनवणार आहोत. पनीर पुलावची रेसिपी कशी बनवायची पाहुयात.
Last Updated: December 09, 2025, 13:57 ISTपुणे : पुणे शहरात अनेक जुने व्यवसाय पाहिला मिळतात. घरगुती खानावळ पद्धतीने सुरु झालेला पुण्यातील सदाशिव पेठेतील पूना बोर्डिंग हाऊसचा प्रवास शंभराव्या वर्षात पोहचला आहे. याठिकाणी जेवणासाठी चक्क रांगा लागलेल्या असतात.
Last Updated: December 09, 2025, 13:23 IST'स्टेटस' चित्रपटातील 'मस्त मगन' गाणं आहे. जे खूपच लोकप्रिय झाले होते. या चित्रपटात दोन वेगवेगळ्या राज्यातील तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतात. अर्जून कपूर पंजाबी तर आलिया तमिळ दाखवली आहे. विचार पटत नसल्याने या दोघांचे लग्न मोडण्यापर्यंत सगळं जातं. दोन्ही कुटुंबातील मतभेद कमी झाल्यावर, अखेरीस कृष आणि अनन्याचे तमिळ आणि पंजाबी अशा दोन्ही पद्धतीने थाटामाटात लग्न होते. हे गाणं अर्जित सिंग याने गायले आहे. चित्रपटात संस्कृती, भाषा आणि कुटुंबांमधील अंतर भरून काढून प्रेमाचा विजय कसा होतो, हे विनोदी आणि भावनिक पद्धतीने दाखवले आहे.
Last Updated: December 09, 2025, 12:31 ISTMarathi Song : मराठी चित्रपट दुनियादारी मधील 'यारा यारा' हे गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. गाण्यात कॉलेजमधील मस्ती, विनोद, गमती आणि खूप काही आठवणी दाखवल्या आहेत. कॉलेजमधील वेगवेगळ्या भागातून आलेले विद्यार्थी एकमेकांचे चांगले मित्र होतात. ती मैत्री मरणानंतरही आठवणीत ठेवतात. ही प्रेमळ मैत्री प्रत्येकाच्या आयुष्यात असते. खूप गमतीशीर किस्से आणि डान्सही या गाण्यात दाखवला आहे. हे गाणं रोहित राउत आणि शिखा जैन यांनी गायले आहे. चित्रपटात स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, उर्मिला कानेटकर, सई ताम्हाणकर, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, संदिप कुलकर्णी यांनी मुख्य भूमिका केली होती.
Last Updated: December 09, 2025, 10:48 ISTBollywood Song : 12Th Fail चित्रपटातील हे 'बोल ना..' गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. विक्रांत मेसी आणि मेधा शंकर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे. या चित्रपटातील गाणं हे प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पाहायला हवे. नायकाच्या अधिकारी होईपर्यंत ती त्याला साध देते. शेवटी हार न मानता, अनेक संकटांचा सामना करत तो नायक अधिकारी बनतो. या चित्रपटात 'बोल ना' हे गाणं सुप्रसिद्ध गायक शान आणि गायिका श्रेया घोषाल यांनी गायले आहे. तर गाण्याला संगीत शंतनू मोइत्रा यांनी दिले आहे. गाण्याचे बोल स्वानंद किरकिरे यांनी लिहिले आहेत.
Last Updated: December 09, 2025, 08:31 ISTBollywood Song : 'हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटातील 'फिर भी तुमको चाहूँगा' गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. चित्रपटात माधव आणि रिया या दोघांची मैत्री होते. ते दोघं बास्केटबॉल खेळाडू असतात. माधव हा गरीब कुटुंबातील तर रिया ही श्रीमंत कुटुंबातून असते. तो तिच्यावर प्रेम करु लागतो. पण ती त्याच्या प्रेमाला नकार देते. या चित्रपटातील हे गाणे सुप्रसिद्ध गायक अर्जित सिंग आणि शाशा तिरुपती यांनी गायले आहे. तर मिथून यांनी संगीत दिले आहे. चित्रपटात अर्जून कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Last Updated: December 08, 2025, 23:36 ISTSuperhit Song : 'मेरे जीवन साथी' चित्रपटातील 'ओ मेरे दिल के चैन' हे गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. या गाण्यात नायक आपल्या प्रेयसीला प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. चित्रपटात एका अमर कथेविषयी दाखवले आहे. खूपच मनाला भावनारी ही प्रेम कथा आहे. हा चित्रपट त्या काळातील सामाजिक आणि कौटूंबिक समस्यांवर मात करून प्रेमाचा विजय कसा होतो, हे दाखवतो. हे गाणं चक्क लोकप्रिय गायक किशोर कुमार यांनी गायले आहे. या गाण्याला संगीत आर.डी.बर्मन यांनी दिले आहे. तर गाण्याचे बोल हे मजरुह सुल्तानपुरी यांनी लिहिले आहे. या चित्रपटात राजेश खन्ना आणि अभिनेत्री तनुजा अशी दिग्गज कास्ट होती.
Last Updated: December 08, 2025, 21:18 ISTश्वान पालनाचा छंद अनेकांना असतो, पण कुत्रा घरी आणण्यापूर्वी त्याच्या देखभालीचा खर्च जाणून घेणे महत्त्वाचे आहे. लॅब्रेडोर जर्मन शेफर्ड की गोल्डन रिट्रीव्हर? कोणत्या जातीच्या श्वानासाठी आहार, लसीकरण आणि ग्रूमिंगवर सर्वाधिक खर्च येतो? तुमच्या बजेटमध्ये कोणता श्वान फिट बसेल, याची सविस्तर आकडेवारी आणि तुलना या लेखात पहा!
Last Updated: December 08, 2025, 20:27 IST