TRENDING:

ही उपचार पद्धती ठरतेय कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान, डॉक्टरांनी सांगितली सविस्तर माहिती, Video

कोल्हापूर : कॅन्सरवरील एक प्रभावी उपचार पद्धती म्हणून किमोथेरपीकडे पाहिले जाते. मात्र या किमोथेरपीमुळे होणाऱ्या छोट्या-मोठ्या दुष्परिणामांमुळे बरेच रुग्ण किमोथेरपी करण्यास घाबरत असतात. मात्र हे दुष्परिणाम तात्पुरत्या स्वरुपाचे असतात. या किमोथेरपीमुळे रुग्णांना कॅन्सर विरोधात लढण्यास मदतच होत असते. याच किमोथेरपीबाबत सर्व आवश्यक माहिती कोल्हापूरच्या डॉ. रेश्मा पवार यांनी दिली असून कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या त्या संचालिका आहेत

Last Updated: November 23, 2025, 17:31 IST
Advertisement

हिवाळ्यात घरीच तयार करा तुरीच्या दाण्यांपासून ‘ही’ खास रेसिपी; 10 मिनिटांत होईल तयार

Food

हिवाळा सुरू झाला की घराघरात खास रेसिपी केल्या जातात. या काळात तुरीचे दाणे सहज उपलब्ध होतात. तुरीच्या दाण्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पण आपण तुरीचे वडे कधी ट्राय केलेत का? 10 मिनिटांत तयार होणारी अगदी सोपी रेसिपी वर्धा येथील गृहिणी नलिनी धानोरकर यांनी सांगितली आहे.

Last Updated: November 23, 2025, 19:02 IST

रक्तदाब आणि शुगर पासून मिळेल आराम; फक्त 10 मिनिट करा 'ही' थेरेपी Video

वर्धा : कांस्य थाळी थेरेपी ही एक प्रभावी उपचारपद्धती आहे. कांस्यच्या धातूने पायांना मसाज केला जातो. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते असे सांगितले जाते. कांस्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्तमिश्रित असतो. त्यापासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सोन्यापेक्षा स्वस्त आणि सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या कांस्य या धातूपासून कांस्याची वाटी बनवली जाते. शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि वात कमी करण्यासाठी कांस्याची वाटी प्रभावी ठरते. जुन्या काळापासून ही एक उपचारपद्धती प्रभावी मानली गेली आहे. आज या थेरेपीचं स्वरूप मशीनमध्ये बघायला मिळत आहे. ही थेरेपी नेमकी कशी दिली जाते? या थेरेपीचे शरीराला काय फायदे आहेत? यासंदर्भात वर्धा येथील कांस्य थाळी थेरेपिस्ट अभिषेक मांजरखेडे यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 23, 2025, 18:51 IST
Advertisement

काकडी खिचडी कधी खाल्लीये का? पुलंनाही आवडायची पुण्यातील आप्पाची चव

पुणे

पुण्याची खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते. पुणेकर खवय्ये असल्याने त्यांचे आवडीचे पदार्थ ही त्याच पद्धतीचे असतात. ते म्हणतात की पुणे तिथे काय उणे त्याच म्हणे प्रमाणे इथल्या गोष्टी ही तशा वेगळ्याच असतात.

Last Updated: November 23, 2025, 17:56 IST

दुर्लक्ष बेतू शकतं जीवावर, ही लक्षणे असतील तर त्वरीत करा 'टीबी'ची चाचणी, Video

सातारा: क्षयरोग अर्थात टीबी हे नुसते नाव ऐकले तरी आजही मनात धडकी भरते. याला कारणही तसेच आहे. क्षयरोग (टीबी) हा मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. जो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो. क्षयरोग उपचार करण्यायोग्य आहे. तरी देखील योग्य काळजी न घेतल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. सातारा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलम मदने यांनी क्षयरोगाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

Last Updated: November 23, 2025, 17:05 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
ही उपचार पद्धती ठरतेय कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान, डॉक्टरांनी सांगितली सविस्तर माहिती, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल