
भास्कर मेहेरे, प्रतिनिधी, यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी त्यातून बाहेर निघत असताना आता रब्बीमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं. यात गहू, चणा, पिकांचे नुकसान झालं आहे. गहू आणि चणा अक्षरशः जमिनीवर लोळला. त्यामुळे शेतकरी हैराण झाला.