TRENDING:

थंडीत गरोदर महिलांनी अशी घ्यावी काळजी, काय करावं आणि काय करू नये? पाहा Video

नाशिक : गरोदरपणाचा काळ हा स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा काळ असतो. पण डिलिव्हरीसाठी नेमका उत्तम काळ कोणता याचे उत्तर मात्र बऱ्याच स्त्रियांना माहीत नसते. कोणी म्हणतं उन्हाळा चांगला, कोणी म्हणतं पावसाळा चांगला, तर कोणी म्हणतं हिवाळा. पण हे मात्र खरं आहे की यापैकी कोणता तरी एकच ऋतू चांगला असतो आणि तो ऋतू म्हणजे हिवाळा होय. हो मंडळी, डिलिव्हरीसाठी हिवाळा हा अतिशय चांगला काळ मानला जातो. हा काळ जरी गरोदरपणासाठी चांगला असला तरी गरोदर स्त्रीने या काळात काही काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. गरोदर महिलांनी हिवाळ्यात काळजी कशी घ्यावी? याबद्दलचं  नाशिक येथील स्त्रीरोग तज्ज्ञ प्रशांत महाजन यांनी माहिती सांगितली आहे.

Last Updated: October 31, 2025, 16:08 IST
Advertisement

गरमागरम शुद्ध तुपात बनवलेली जिलेबी, ठाणेकर खवय्यांसाठी पर्वणीच, 127 वर्षांपासून आहे प्रसिद्ध

ठाणे : कुरकुरीत, रसरशीत आणि गोड जिलेबी सर्वांनाच आवडते. घरात शुभकार्य असल्यावर वाटण्यासाठी असो किंवा कोण्या पाहुण्यांकडे जाताना गोड काही द्यायला असो या रसरशीत जिलेबीला प्रधान्य दिलं जातं. ठाण्यात मिळणारी जिलेबीही खवय्यांसाठी पर्वणीच आहे. ठाण्यात 127 वर्ष जुनं असणारे मुंबादेवी जलेबीवाला हे जिलेबीचे दुकान प्रसिद्ध आहे. शुद्ध तुपात तळल्या जाणाऱ्या या जिलेब्या ठाणेकर खवय्ये आवडीने खातात.

Last Updated: October 31, 2025, 15:29 IST

दादरमधील प्रसिद्ध मिठाईचं दुकान, तिसरी पिढी करतेय नेतृत्त्व, जपलीय तब्बल 91 वर्षांची परंपरा

मुंबई : मलई पेढे, बर्फी, मिठाई, शुद्ध तूप आणि दही हे दुग्धजन्य पदार्थ सर्वांच्याच आवडीचे आहेत. हे पदार्थ जिथे शुद्ध मिळतात त्या ठिकाणी तर लोकांची गर्दीच होते. दादरकरांची अशीच गर्दी दादर स्थानकासमोर असणाऱ्या सामंत ब्रदर्स या मिठाईच्या दुकानासमोर होते. सामंत ब्रदर्स हे मिठाईचे दुकान गेले 91 वर्ष म्हणजेच 1933 पासून दादरमध्ये आपले शुध्द तूप, लस्सी आणि मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. सामंत ब्रदर्स यांच्या दुकानात मिळणारे पियुष हे पेय दादरकरांचे सर्वात आवडीचे पेय आहे. इथे हे पिण्याकरिता अनेकांची गर्दी होते.

Last Updated: October 31, 2025, 15:03 IST
Advertisement

पेट्रोल पंपावरील कामगार कसा बनला उद्योजक? सोलापुरी चटणीला परदेशातून मागणी

Food

सोलापूर : सोलापुरी जेवणाच्या ताटात तुम्हाला इतर पदार्थांबरोबर तीन पदार्थ निश्चित दिसतील. ते पदार्थ म्हणजे ज्वारीची भाकरी, शेंगादाण्याची चटणी आणि मिरचीचा ठेचा. घराघरात असणारा हा मेनू जिल्ह्याच्या खाद्यसंस्कृतीची ओळख बनला आहे. सोलापूर- पुणे महामार्गावरील विविध हॉटेल या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. पण या पदार्थांना कोंडीच्या नसले बंधूनी ब्रँड बनवले आहे. आज नसले बंधूंची शेंगा चटणीबरोबर इतर उत्पादने देशातील अग्रेसर मॉलमध्ये विकले जात आहेत. परदेशातही या शेंगा चटणीची चव चाखली जाते.

Last Updated: October 31, 2025, 14:38 IST

काळ्या रश्यातली मिसळ खाल्लीये कधी? झणझणीत, तर्रीदार

नाशिक : आपली मराठी भाषा जशी वळणावळणावर बदलते, तसा चटणीचा ठसकाही वाटा-वाटांवर बदलतो. कारण राज्याच्या विविध भागांमध्ये विविध मसाले वापरले जातात. ते बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. तसंच प्रत्येक जिल्ह्याचा खास पदार्थही जगभरात लोकप्रिय आहे. जसं की, मुंबईचा वडापाव आणि नाशिकची मिसळ.

Last Updated: October 31, 2025, 14:06 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नाशिक/
थंडीत गरोदर महिलांनी अशी घ्यावी काळजी, काय करावं आणि काय करू नये? पाहा Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल