नाशिक : आजकाल अनेक लोक कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्यांना आवडीनुसार पाळतात. हे पाळीव प्राणी केवळ आपल्यासाठी सोबतदार नसतात तर आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य भागही बनतात. त्यामुळे त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य बनते. थंडीच्या हंगामात त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.