
पुणे: वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे प्रतीक असलेली आणि देहू–आळंदी परिसरातून वाहणारी इंद्रायणी नदी गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. अनेक कंपन्यांचे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने पाण्याची गुणवत्ता ढासळली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया लोकल18 ने जाणून घेतल्या.