दुर्योधनाच्या जन्माची स्टोरी म्हणजे गांधारीला शंभर पुत्र होतील असा आशीर्वाद महर्षी व्यासांनी दिला होता. गांधारी गर्भवतीही झाली. पण 2 वर्षे मूल जन्माला आलंच नाही. त्याचवेळी कुंतीने युधिष्ठिरला जन्म दिला. तेव्हा गांधारीने धृतराष्ट्रला न सांगता आपला गर्भपात करवला आणि लोखंडासारखं कडक मांसाचं पिंड निघालं. ती ते फेकून देत होती पण तेव्हा व्यासांनी तिला थांबवलं. त्यांच्या सल्ल्यानुसार तिनं ते मांसाचं पिंड थंड पाण्यात ठेवलं. त्यातून 101 भ्रूण वेगळे झाले. ते वेगवेगळ्या घड्यात ठेवले. एक वर्षानंतर एका घड्यातून दुर्योधनाचा जन्म झाला.
advertisement
Mahabharat : 100 कौरवांपैकी दुर्योधन, दुशासन माहितीयेत, इतर कौरवांची नावं काय?
दुर्योधनाच्या जन्मानंतर भयंकर घडलं दुर्योधनचा जन्म होताच तो गाढवासारखा कर्कश आवाजात ओरडू लागला. त्याच वेळी गिधाडं, घुबडं, कोल्हे आणि कावळेदेखील ओरडायला लागले. म्हणजे खूप विचित्र आवाज येऊ लागले. आकाश काळं झालं. अनेक ठिकाणी आग लागली. हे पाहून सगळे घाबरले. धृतराष्ट्र घाबरला.
ब्राह्मण आणि ज्योतिष काय म्हणाले?
ब्राह्मण आणि ज्योतिष्यांनी दुर्योधनाचा जन्माचा तो काळ मोजला. त्याला आढळलं की दुर्योधनाचा जन्म इतक्या वाईट वेळी झाला होता की तो संपूर्ण कुळ आणि कुटुंबाच्या विनाशाचं कारण बनेल. यामुळे त्यांच्यात युद्धे आणि संघर्ष होतील. मग ज्योतिषांनी धृतराष्ट्राला या मुलाला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. त्याला जवळ ठेवलं तर संकटं येतील असं त्यांनी सांगितलं. पण धृतराष्ट्राने आपल्या मुलावरील प्रेमामुळे असं करण्यास नकार दिला.
खरंच विनाशाची ती भविष्यवाणी खरी ठरली
दुर्योधनाच्या जन्मावेळी करण्यात आलेली भविष्यवाणी खरी ठरली. त्या काळातील ऋषीमुनींनी भाकीत केलं होतं की हे मूल, त्याच्या अहंकार, मत्सर आणि चुकीमुळे एका महायुद्धाला जन्म देईल. ज्यामध्ये हजारो योद्धे मारले जातील. कौरवांचा नाश होईल. शेवटी हेच घडलं. महाभारत युद्ध झालं, कौरवांचा नाश झाला.
Mahabharat : महाभारत युद्धात मारले गेलेले योद्धे, 15 वर्षांनी पुन्हा जिवंत झाले, पण कसे?
दुर्योधन हा अनेकदा पांडवांबद्दलच्या त्याच्या अहंकार आणि द्वेषासाठी ओळखला जातो. दुर्योधनाला कलियुगाचा अवतार मानले जाते, ज्यामध्ये कलियुगात स्वार्थासाठी स्वीकारले जाणारे सर्व गुण होते.