TRENDING:

Mahabharat : दुर्योधनाचा जन्म होताच घाबरले होते लोक, म्हणाले, याला जंगलात फेका

Last Updated:

Mahabharat story : महाभारतातील व्हिलन दुर्योधनाच्या जन्माचीही एक वेगळीच कथा आहे. त्याचा जन्म कसा झाला हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या जन्मानंतरही भयंकर घडलं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
News18
News18
advertisement

दुर्योधनाच्या जन्माची स्टोरी म्हणजे गांधारीला शंभर पुत्र होतील असा आशीर्वाद महर्षी व्यासांनी दिला होता. गांधारी गर्भवतीही झाली. पण 2 वर्षे मूल जन्माला आलंच नाही. त्याचवेळी कुंतीने युधिष्ठिरला जन्म दिला. तेव्हा गांधारीने धृतराष्ट्रला न सांगता आपला गर्भपात करवला आणि लोखंडासारखं कडक मांसाचं पिंड निघालं. ती ते फेकून देत होती पण तेव्हा व्यासांनी तिला थांबवलं. त्यांच्या सल्ल्यानुसार तिनं ते मांसाचं पिंड थंड पाण्यात ठेवलं. त्यातून 101 भ्रूण वेगळे झाले. ते वेगवेगळ्या घड्यात ठेवले. एक वर्षानंतर एका घड्यातून दुर्योधनाचा जन्म झाला.

advertisement

Mahabharat : 100 कौरवांपैकी दुर्योधन, दुशासन माहितीयेत, इतर कौरवांची नावं काय?

दुर्योधनाच्या जन्मानंतर भयंकर घडलं दुर्योधनचा जन्म होताच तो गाढवासारखा कर्कश आवाजात ओरडू लागला. त्याच वेळी गिधाडं, घुबडं, कोल्हे आणि कावळेदेखील ओरडायला लागले. म्हणजे खूप विचित्र आवाज येऊ लागले. आकाश काळं झालं. अनेक ठिकाणी आग लागली. हे पाहून सगळे घाबरले. धृतराष्ट्र घाबरला.

advertisement

ब्राह्मण आणि ज्योतिष काय म्हणाले?

ब्राह्मण आणि ज्योतिष्यांनी दुर्योधनाचा जन्माचा तो काळ मोजला. त्याला आढळलं की दुर्योधनाचा जन्म इतक्या वाईट वेळी झाला होता की तो संपूर्ण कुळ आणि कुटुंबाच्या विनाशाचं कारण बनेल. यामुळे त्यांच्यात युद्धे आणि संघर्ष होतील. मग ज्योतिषांनी धृतराष्ट्राला या मुलाला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. त्याला जवळ ठेवलं तर संकटं येतील असं त्यांनी सांगितलं. पण धृतराष्ट्राने आपल्या मुलावरील प्रेमामुळे असं करण्यास नकार दिला.

advertisement

खरंच विनाशाची ती भविष्यवाणी खरी ठरली

दुर्योधनाच्या जन्मावेळी करण्यात आलेली भविष्यवाणी खरी ठरली. त्या काळातील ऋषीमुनींनी भाकीत केलं होतं की हे मूल, त्याच्या अहंकार, मत्सर आणि चुकीमुळे एका महायुद्धाला जन्म देईल. ज्यामध्ये हजारो योद्धे मारले जातील. कौरवांचा नाश होईल. शेवटी हेच घडलं. महाभारत युद्ध झालं, कौरवांचा नाश झाला.

Mahabharat : महाभारत युद्धात मारले गेलेले योद्धे, 15 वर्षांनी पुन्हा जिवंत झाले, पण कसे?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थेट टेरेसवर भरते कवितांची मैफिल, मनाला भिडणारं संभाजीनगरमधील गेट-टुगेदर, Video
सर्व पहा

दुर्योधन हा अनेकदा पांडवांबद्दलच्या त्याच्या अहंकार आणि द्वेषासाठी ओळखला जातो. दुर्योधनाला कलियुगाचा अवतार मानले जाते, ज्यामध्ये कलियुगात स्वार्थासाठी स्वीकारले जाणारे सर्व गुण होते.

मराठी बातम्या/Viral/
Mahabharat : दुर्योधनाचा जन्म होताच घाबरले होते लोक, म्हणाले, याला जंगलात फेका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल