advertisement

Mahabharat : महाभारत युद्धात मारले गेलेले योद्धे, 15 वर्षांनी पुन्हा जिवंत झाले, पण कसे?

Last Updated:

Mahabharat story : विदुराच्या मृत्युनंतर जेव्हा महर्षी वेदव्यास धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंतीला भेटले तेव्हा त्यांनी आपल्या मृत पुत्रांना पुन्हा पाहायचं आहे, अशी इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त केली होती.

AI Generated image
AI Generated image
नवी दिल्ली : भारतीय महाकाव्याचा अविभाज्य भाग असलेलं महाभारत हे केवळ युद्धाची कथा नाही तर जीवनातील खोल तत्वे आणि घटनांचे वर्णन देखील आहे. महाभारत आणि महाभारत युद्धापर्यंत तुम्हाला सगळं माहिती असेल. पण महाभारताच्या युद्धानंतर काय घडलं ते अनेकांना माहिती नाही. युद्धानंतर 15 वर्षांनी घडली एक विचित्र घटना घडली. महाभारत युद्धा मारले गेलेले योद्धे पुन्हा जिवंत झाले होते.
महाभारत युद्धानंतर, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न होता की युद्धातील सर्व वीर आणि योद्धे पुन्हा कधी एकत्र भेटतील का? या कथेत, ती अनोखी घटना घडते, भोपाळचे ज्योतिषी पंडित योगेश चौरे यांनी याबाबत सविस्तर सांगितलं आहे.
विदुराच्या मृत्युनंतर जेव्हा महर्षी वेदव्यास धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंतीला भेटले तेव्हा या दुःखी आत्म्यांच्या मनात एक इच्छा निर्माण झाली. त्यांनी महर्षींना विनंती केली की त्यांना त्यांच्या मृत पुत्रांना पुन्हा पहायचं आहे. आपल्या तपश्चर्येच्या बळावर, वेद व्यासांनी त्यांची इच्छा पूर्ण करण्याचं व्रत घेतलं.
advertisement
वेद व्यासांनी मृत योद्ध्यांना नवीन जीवन दिलं
वेद व्यास यांनी गंगेच्या काठावर जाऊन महाभारतातील मृत योद्ध्यांना नवीन जीवन दिलं. या दिव्य विधीत, भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन, दुशासन, अभिमन्यू, घटोत्कच आणि द्रौपदीचे पाच पुत्र असे अनेक महान योद्धे पुन्हा जिवंत झाले. या अनोख्या घटनेने सर्वांना धक्का बसला, पण हे योद्धे पुन्हा जिवंत होताच त्यांच्या हृदयातील सर्व राग आणि द्वेष निघून गेला. आता ते सर्व एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागू लागले होते.
advertisement
दुर्योधनाची आत्मकबुली आणि जीवनाचं अंतिम सत्य
महाभारतातील सर्वात मनोरंजक घटनांपैकी एक घडली जेव्हा दुर्योधनाने द्रौपदीला काहीतरी महत्त्वाचं सांगितलं. द्रौपदीशी झालेल्या गैरवर्तनाचा पश्चात्ताप करत दुर्योधन म्हणाला, “हे देवी! मी तुमच्याशी जे केलं त्याची आता मला लाज वाटते. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. मी ज्या सिंहासनासाठी आणि ज्या भूमीसाठी लढलो ते सर्व व्यर्थ गेलं. आयुष्यात मी जे काही मिळवलं ते माझ्यासोबत जाऊ शकत नव्हतो हे आता मला जाणवलं आहे. कृपया माफ करा."
advertisement
द्रौपदीने त्याची माफी स्वीकारली आणि मनापासून क्षमा करण्यात आली. ही घटना जीवनातील सखोल सत्य प्रतिबिंबित करते की शेवटी कोणतीही भौतिक संपत्ती जीवनासोबत जात नाही.
एका रात्रीचा अद्भुत
अनुभव वेदव्यासांच्या आशीर्वादाने, धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांना त्यांच्या मृत पुत्रांना एका रात्रीसाठी पाहता आलं. या रात्रीने सर्वांच्या हृदयात शांती आणली आणि त्यांच्या हरवलेल्या कुटुंबासोबत काही क्षण घालवून ते त्यांचे दुःख काही प्रमाणात कमी करू शकले. जरी, या रात्रीनंतर ते पुन्हा दुसऱ्या जगात परतले, परंतु महाभारताच्या युद्धानंतर या घटनेने एक विचित्र शांतता आणली.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Mahabharat : महाभारत युद्धात मारले गेलेले योद्धे, 15 वर्षांनी पुन्हा जिवंत झाले, पण कसे?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement