फसवणुकीची सुरुवात फक्त 1 हजार रुपयांपासून केली...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नटवरलाल बनावट स्वाक्षऱ्या बनवण्यात माहिर होते. त्यांनी केवळ 1 हजार रुपयांपासून आपल्या फसवणुकीची सुरुवात केली, त्यामध्ये त्यांनी त्यांच्या शेजाऱ्याच्या सहीची नक्कल करून बँकेतून काढले. त्यांची खासियत म्हणजे ते कोणाचीही सही फक्त पाहूनच तशीच कॉपी करू शकत होते. याच कौशल्यामुळे हळू हळू ते भारताचे सर्वात मोठे फसवणूक करणारे व्यक्ती बनले.
advertisement
8 राज्यांची पोलीस त्यांच्या मागावर
नटवरलाल यांच्या फसवणुकीचा अंदाज यावरून लावता येतो की, त्यांनी बनावट चेक आणि डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून अनेक दुकानदारांना लाखो रुपयांचा गंडा घातला. 70, 80 आणि 90 च्या दशकात त्यांचे नाव देशभरात कुप्रसिद्ध झाले. या धूर्त ठगाविरुद्ध 100 हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल होते आणि देशातील 8 राज्यांची पोलीस त्यांच्या मागावर होती. त्यांना अनेकवेळा पकडले गेले आणि तुरुंगाची शिक्षाही झाली, पण भारतातील कोणतीही जेल त्यांना जास्त काळ ठेवू शकली नाही. ते प्रत्येक वेळी पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.
लाल किल्ला दोनदा आणि राष्ट्रपती भवन एकदा विकले होते
टाइम्स ऑफ इंडियानुसार, असं म्हटलं जातं की नटवरलालने ताजमहाल 3 वेळा, लाल किल्ला दोनदा, राष्ट्रपती भवन एकदा आणि खुद्द संसद भवनही विकले. ते या ऐतिहासिक इमारतींची बनावट कागदपत्रे तयार करत असत आणि उच्च सरकारी अधिकारी असल्याचे सांगून परदेशी व्यावसायिकांना विकत असत. त्यांच्या फसवणुकीच्या कथा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीत.
'मी भारताचे सर्व परदेशी कर्ज फेडू शकतो'
मीडिया रिपोर्ट्सनुसार, असं म्हटलं जातं की एकदा राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद नटवरलालच्या गावाजवळ आले होते. नटवरलालला त्यांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्याने तिथे आपली प्रतिभा दाखवली. त्यांनी राष्ट्रपतींच्या सहीची अगदी तशीच नक्कल केली, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. नटवरलालने राष्ट्रपतींना गंमत म्हणून सांगितले, "जर तुम्ही म्हणालात तर मी भारताचे सर्व परदेशी कर्ज फेडू शकतो आणि त्या बदल्यात मी परदेशी लोकांना भारताचा कर्जदार बनवू शकतो!" त्यांचे बोलणे ऐकून लोक थक्क झाले.
हे ही वाचा : Mahabharat : म्हणतात, अजूनही आहेत कर्णाचे कवच कुंडल, पण ते कुठे ठेवलेत?
हे ही वाचा : ना झाडं, ना प्राणी, फक्त भयान शांतता... हे भुताटकीचं गाव आहे तरी कुठं? जिथे 200 वर्षांपूर्वी अचानक गायब झाले गावकरी