Mahabharat : म्हणतात, अजूनही आहेत कर्णाचे कवच कुंडल, पण ते कुठे ठेवलेत?

Last Updated:

Mahabharat Story : दानशूर कर्णाला सूर्यदेवाकडून मिळाले कवचकुंडल इंद्रदेवांनी कपटाने त्याच्याकडून दान म्हणून मिळवले पण त्यांना ते आपल्यासोबत स्वर्गात नेता आले नाही. ते आजही अस्तित्वात आहेत, असं म्हणतात.

AI Generated image
AI Generated image
नवी दिल्ली : कर्ण हा सूर्यदेवाचा पुत्र. ज्याचा जन्म कुंतीने लग्नापूर्वी दुर्वास ऋषींनी दिलेल्या मंत्राने झाला असं म्हणतात. कर्णाला सूर्यदेवाकडून दिव्य कवचकुंडल मिळालं होतं. ज्यामुळे कोणीच काही त्याचं बिघडवू शकत नव्हतं. कर्ण जितका महान योद्धा आणि धनुर्धर होता, तितकाच तो मोठा दाता होता. दानशूर कर्णाला सूर्यदेवाकडून मिळाले कवचकुंडल इंद्रदेवांनी कपटाने त्याच्याकडून दान म्हणून मिळवले पण त्यांना ते आपल्यासोबत स्वर्गात नेता आले नाही. ते आजही अस्तित्वात आहेत, असं म्हणतात.
एके दिवशी कर्ण स्नान करून सूर्यदेवाची आराधना करत होता. पूजा आटोपताच इंद्रदेव ब्राह्मणाच्या रूपात आले आणि त्यांनी कर्णाकडून कवचकुंडल मागितलं. असं म्हणतात की त्यांच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परतलं नाही, परिस्थिती कशीही असो. त्याच्याकडून ज्याने काही मागितलं ते त्याला मिळालं. महाभारताच्या युद्धापूर्वी इंद्रदेवांना भीती वाटत होती की जर आपला मुलगा अर्जुन कर्णाशी लढला तर कर्ण त्याच्यावर विजय मिळवेल. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडून त्याचं कवचकुंडल दान म्हणून मागून घेतलं होते. कर्णानेही दानाला नकार दिला नाही. कोणताही विचार न करता कर्णाने आपले कवचकुंडल भगवान इंद्राला दान केले. जर इंद्रदेवाने कर्णाची फसवणूक करून त्याच्याकडून कवचकुंडल घेतलं नसतं तर महाभारत युद्धात कर्णाचा पराभव करणं आणखी कठीण झालं असतं.
advertisement
लोक मान्यतेनुसार, जेव्हा भगवान इंद्राला कर्णाचे कवचकुंडल मिळाले, तेव्हा त्यांनी ते स्वर्गात नेले नाही. तर मग ते कुठे आहेत?
गुहेत आहेत कवचकुंडल?
असं म्हणतात एका गुहेत हे कवच कुंडल आहेत. त्या गुहेतून एक प्रकाश बाहेर पडतो. या गुहेत जाण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. आता त्या गुहेत प्रवेश करण्याचा आणि बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे त्या गुहेत सूर्यप्रकाशही पोहोचू शकत नाही. पण त्या गुहेतून प्रकाश बाहेर पडतो. त्यामुळे इथं ते कवचकुंडल असावेत असं म्हणतात.
advertisement
असं मानलं जातं की जेव्हा इंद्रदेव कर्णाचे कवचकुंडल घेऊन जात होते तेव्हा सूर्यदेव त्याच्यावर खूप रागावले आणि त्यांनी त्याला शाप दिला. शापामुळे इंद्राच्या रथाचं चाक याच ठिकाणी अडकलं. त्यानंतर त्या ठिकाणी एक गुहा तयार करण्यात आली आणि कर्णाचे कवचकुंडल इथं लपवून ठेवण्यात आले. ते कवचकुंडल इतके शक्तिशाली होते की इंद्रालाही ते आपल्यासोबत स्वर्गात नेणं शक्य नव्हतं.  छत्तीसगडमधील विजापूर येथील या गुहेत कर्णाचे कवचकुंडल आजही ठेवलेले असल्याचं मानलं जाते. त्या गुहेजवळ इंद्राच्या रथाच्या चाकांच्या खुणा असल्याचं स्थानिक सांगतात.
advertisement
समुद्राजवळ आहेत कवचकुंडल?
दुसऱ्या मान्यतेनुसार पुरीच्या कोणार्कमध्ये कर्णाचे कवचकुंडल ठेवलेले आहेत. असं म्हणतात की इंद्रदेवांनी ते कपटाने मिळवले होते, त्यामुळे ते स्वर्गात नेऊ शकले नाहीत. मग त्यांनी ते समुद्रकिनाऱ्यावर लपवले. चंद्रदेवाने त्यांना हे करताना पाहिलं होतं. चंद्रदेव कर्णाचे कवचकुंडल घेऊन जाऊ लागले तेव्हा समुद्रदेवाने त्यांना थांबवलं. लोकमान्यतेनुसार सूर्यदेव आणि समुद्रदेव तेव्हापासून कवचकुंडलाचं रक्षण करत आहेत.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Mahabharat : म्हणतात, अजूनही आहेत कर्णाचे कवच कुंडल, पण ते कुठे ठेवलेत?
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement