advertisement

MahaShivratri 2026: नोकरी, पैशांची चिंता, लग्न होण्यास उशीर..! कित्येक अडचणींवर महाशिवरात्रीला करण्याचा खास उपाय

Last Updated:

Maha Shivratri 2026: अपराजिता या शब्दाचा अर्थच असा आहे की जिला हरवले जाऊ शकत नाही. कदाचित याच कारणामुळे हे फूल विजय, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. शिवपूजेत हे फूल अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे.

News18
News18
मुंबई : महाशिवरात्री जवळ आली की वातावरणात एक वेगळाच उत्साह जाणवू लागतो. मंदिरांमधील गर्दी, हर हर महादेवचा जयघोष आणि लोकांच्या मनात एकच आशा असते - यावेळेस काहीतरी चांगले घडावे. कोणी नोकरीमुळे त्रस्त आहे, कोणी पैशांच्या अडचणीमुळे, तर कोणी मेहनत करूनही फळ मिळत नसल्यामुळे. अशा वेळी लोक फक्त पूजाच करत नाहीत, तर मनाला उभारी देणारे छोटे छोटे उपायही शोधतात. यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे अपराजिताचे फूल. निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे हे फूल दिसायला साधे असले तरी धार्मिक मान्यतेनुसार त्याला विशेष स्थान आहे. महाशिवरात्रीला या फुलाचे उपाय केल्याने करिअर, धन आणि घरातील त्रासांमधून सुटका मिळते, असे सांगितले जाते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा याविषयी अधिक माहिती देत आहेत.
अपराजिता या शब्दाचा अर्थच असा आहे की जिला हरवले जाऊ शकत नाही. कदाचित याच कारणामुळे हे फूल विजय, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. शिवपूजेत हे फूल अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. ही फुले मनातील भीती कमी करतात आणि माणसाला आतून भक्कम बनवते, अशीही धारणा आहे. सध्याच्या काळातील रोजचा तणाव, कामाचा दबाव आणि पैशांच्या चिंतेत असतात, पूजेमध्ये हे फून आशेचे प्रतीक मानले जाते.
advertisement
आर्थिक अडचणींपासून सुटकेसाठी उपाय - घरात सतत पैशांची कमतरता जाणवत असेल, खर्च वाढत असतील किंवा बचत होत नसेल, तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात जावे. तिथे 11 अपराजिताची फुले शिवलिंगावर अर्पण करावीत. पूजेनंतर त्यातील एक फूल घरी परत आणावे. ते फूल वाळवून आपल्या पर्समध्ये, तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे ठेवून द्यावे. लोकांच्या मते यामुळे पैसा टिकू लागतो आणि विनाकारण होणारे खर्च कमी होतात. या उपायानंतर अनेकांना कमाईच्या नवीन संधी मिळाल्याचे अनुभव आहेत.
advertisement
नोकरी आणि पदोन्नतीसाठी काय करावे - अनेकदा आपण काम तर पूर्ण करतो पण त्याला योग्य ओळख मिळत नाही. अशा वेळी महाशिवरात्रीला अपराजिताचे फूल अर्पण करताना शिव मंत्र किंवा ॐ नमः शिवाय चा जप किमान 51 वेळा करावा. पूजेनंतर ते फूल घरी आणून आपल्या कामाच्या टेबलावर (वर्क डेस्क), बॅगेत किंवा फाईलजवळ ठेवावे. यामुळे अडकलेली कामे पुढे सरकतात आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळू लागते, अशी मान्यता आहे.
advertisement
लग्न जुळण्यासाठी - लग्नाचे बोलणे वारंवार अडकत असेल, तर महाशिवरात्रीला दोन अपराजिताची फुले पाण्याने भरलेल्या तांब्यात टाकावीत. त्याच जलाने शिवलिंगावर अभिषेक करावा. त्यानंतर ती फुले घरी आणून अशा ठिकाणी ठेवावीत जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या वस्तू ठेवता. यामुळे योग्य जोडीदार मिळण्याचा मार्ग मोकळा होतो आणि बोलणे लवकर पक्के होते, असे मानले जाते.
advertisement
शिक्षण आणि करिअरमधील प्रगतीसाठी -विद्यार्थी किंवा नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी अपराजिताचे एक फूल आणि थोडे तांदूळ पांढऱ्या कपड्यात बांधून एक छोटी बॅग तयार करावी. ती 11 दिवस पूजेच्या ठिकाणी ठेवावी. 11 व्या दिवशी ती वाहत्या पाण्यात प्रवाहित करावी. यामुळे एकाग्रता वाढते आणि परीक्षा किंवा मुलाखतीमध्ये आत्मविश्वास वाढतो, असे म्हटले जाते.
advertisement
श्रद्धेसोबतच मेहनतही महत्त्वाची - धार्मिक उपाय मनाला शक्ती देतात, पण त्यासोबतच मेहनत, योग्य नियोजन आणि संयम तितकाच महत्त्वाचा आहे. अपराजिताचे फूल एक प्रकारे सकारात्मक विचारांचे प्रतीक आहे - की परिस्थिती कशीही असो, हार मानायची नाही. महाशिवरात्रीला उचललेले प्रत्येक छोटे पाऊल लोकांना नवीन आशा देते. हाच विश्वास कदाचित पुढे जाण्याची खरी ताकद बनतो.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
MahaShivratri 2026: नोकरी, पैशांची चिंता, लग्न होण्यास उशीर..! कित्येक अडचणींवर महाशिवरात्रीला करण्याचा खास उपाय
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement