advertisement

Heart Attack : भारतामध्ये 99% हार्ट अटॅक 'या' 4 कारणांमुळे होतात, याचे Signs आणि उपाय लगेच समजून घ्या

Last Updated:
केवळ 2014 ते 2019 या 5 वर्षांच्या काळात हृदयविकाराच्या झटक्यांच्या प्रकरणांमध्ये तब्बल 50% वाढ झाली आहे. ही आकडेवारी केवळ संख्या नाही, तर आपल्या बदलत्या जीवनशैलीने आपल्या शरीराला दिलेल्या धोक्याची घंटा आहे.
1/9
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण घड्याळाच्या काट्यावर धावत असतो. ऑफिसचं टार्गेट, मुलांचं शिक्षण आणि घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपण स्वतःच्या आरोग्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण घड्याळाच्या काट्यावर धावत असतो. ऑफिसचं टार्गेट, मुलांचं शिक्षण आणि घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपण स्वतःच्या आरोग्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. "मला काय होतंय, मी तर ठणठणीत आहे," असं म्हणत आपण रोजचं तेलकट खातो आणि व्यायामाचा कंटाळा करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? भारतात गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या प्रमाणात धक्कादायक वाढ झाली आहे.
advertisement
2/9
केवळ 2014 ते 2019 या 5 वर्षांच्या काळात हृदयविकाराच्या झटक्यांच्या प्रकरणांमध्ये तब्बल 50% वाढ झाली आहे. ही आकडेवारी केवळ संख्या नाही, तर आपल्या बदलत्या जीवनशैलीने आपल्या शरीराला दिलेल्या धोक्याची घंटा आहे. शहरीकरण, जंक फूडचे सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे आज केवळ वयोवृद्धच नाही, तर तरुण पिढीही हृदयविकाराच्या विळख्यात अडकत चालली आहे.
केवळ 2014 ते 2019 या 5 वर्षांच्या काळात हृदयविकाराच्या झटक्यांच्या प्रकरणांमध्ये तब्बल 50% वाढ झाली आहे. ही आकडेवारी केवळ संख्या नाही, तर आपल्या बदलत्या जीवनशैलीने आपल्या शरीराला दिलेल्या धोक्याची घंटा आहे. शहरीकरण, जंक फूडचे सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे आज केवळ वयोवृद्धच नाही, तर तरुण पिढीही हृदयविकाराच्या विळख्यात अडकत चालली आहे.
advertisement
3/9
हृदयविकाराचा झटका नक्की का येतो?आपल्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा रक्ताची गुठळी निर्माण होते, तेव्हा रक्ताचा प्रवाह थांबतो. यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या पेशी मृत होऊ लागतात. यालाच आपण हार्ट अटॅक म्हणतो.
हृदयविकाराचा झटका नक्की का येतो?आपल्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा रक्ताची गुठळी निर्माण होते, तेव्हा रक्ताचा प्रवाह थांबतो. यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या पेशी मृत होऊ लागतात. यालाच आपण हार्ट अटॅक म्हणतो.
advertisement
4/9
अपोलो हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. सुधीर कुमार (CMC वेल्लोर प्रशिक्षित) यांच्या मते, जवळपास 99% हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक हे शरीरात आधीपासून असलेल्या पण दुर्लक्षित राहिलेल्या आजारांमुळे येतात. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण निरोगी आहोत, पण आतल्या आत आजार बळावत असतो.
अपोलो हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. सुधीर कुमार (CMC वेल्लोर प्रशिक्षित) यांच्या मते, जवळपास 99% हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक हे शरीरात आधीपासून असलेल्या पण दुर्लक्षित राहिलेल्या आजारांमुळे येतात. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण निरोगी आहोत, पण आतल्या आत आजार बळावत असतो.
advertisement
5/9
'हे' 4 छुपे शत्रू ओळखायला शिकाबहुतेक लोकांना पहिला हार्ट अटॅक येण्यापूर्वी खालीलपैकी किमान एक छुपा आजार असतोच
1. उच्च रक्तदाब (Hypertension): याला 'सायलेंट किलर' म्हणतात. हा रक्तवाहिन्यांचे नुकसान करतो.
2. वाढलेले कोलेस्ट्रॉल: रक्तातील एलडीएल (LDL) कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात.
3. मधुमेह (Diabetes): रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांचे कार्य बिघडते.
4. धुम्रपान: तंबाखू आणि सिगारेटमुळे हृदयाच्या पेशींचे प्रचंड नुकसान होते.
'हे' 4 छुपे शत्रू ओळखायला शिकाबहुतेक लोकांना पहिला हार्ट अटॅक येण्यापूर्वी खालीलपैकी किमान एक छुपा आजार असतोच1. उच्च रक्तदाब (Hypertension): याला 'सायलेंट किलर' म्हणतात. हा रक्तवाहिन्यांचे नुकसान करतो.2. वाढलेले कोलेस्ट्रॉल: रक्तातील एलडीएल (LDL) कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात.3. मधुमेह (Diabetes): रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांचे कार्य बिघडते.4. धुम्रपान: तंबाखू आणि सिगारेटमुळे हृदयाच्या पेशींचे प्रचंड नुकसान होते.
advertisement
6/9
हार्ट अटॅकची लक्षणे: याकडे दुर्लक्ष नकोचछातीत सतत किंवा वारंवार होणाऱ्या वेदना किंवा दाब जाणवणे.
वेदना हाताकडे, मानेकडे, जबड्याकडे किंवा पाठीकडे पसरणे.
श्वास घेण्यास त्रास होणे किंवा दम लागणे.
मळमळणे, उलट्या होणे किंवा छातीत जळजळ (Heartburn) होणे.
अचानक चक्कर येणे किंवा खूप घाम येणे.
विनाकारण प्रचंड थकवा जाणवणे.
हार्ट अटॅकची लक्षणे: याकडे दुर्लक्ष नकोचछातीत सतत किंवा वारंवार होणाऱ्या वेदना किंवा दाब जाणवणे.वेदना हाताकडे, मानेकडे, जबड्याकडे किंवा पाठीकडे पसरणे.श्वास घेण्यास त्रास होणे किंवा दम लागणे.मळमळणे, उलट्या होणे किंवा छातीत जळजळ (Heartburn) होणे.अचानक चक्कर येणे किंवा खूप घाम येणे.विनाकारण प्रचंड थकवा जाणवणे.
advertisement
7/9
हृदय निरोगी ठेवण्यासाठी 'पंचसूत्र'1. आहार बदल: आहारात मीठ, साखर आणि तेलकट पदार्थांचे प्रमाण कमी करा. फळे, भाज्या आणि कडधान्यांचा समावेश वाढवा.
2. नियमित व्यायाम: दिवसातून किमान 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे हृदयाला मजबुती देते.
3. तणाव व्यवस्थापन: मानसिक तणावामुळे रक्तदाब वाढतो. यासाठी ध्यान (Meditation) किंवा योगासने करा.
4. व्यसनमुक्ती: धुम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे टाळणे हा हृदय वाचवण्याचा सोपा मार्ग आहे.
5. नियमित तपासणी: वयाची 30 वर्षे पूर्ण झाल्यावर नियमितपणे ब्लड प्रेशर, शुगर आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी करा.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी 'पंचसूत्र'1. आहार बदल: आहारात मीठ, साखर आणि तेलकट पदार्थांचे प्रमाण कमी करा. फळे, भाज्या आणि कडधान्यांचा समावेश वाढवा.2. नियमित व्यायाम: दिवसातून किमान 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे हृदयाला मजबुती देते.3. तणाव व्यवस्थापन: मानसिक तणावामुळे रक्तदाब वाढतो. यासाठी ध्यान (Meditation) किंवा योगासने करा.4. व्यसनमुक्ती: धुम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे टाळणे हा हृदय वाचवण्याचा सोपा मार्ग आहे.5. नियमित तपासणी: वयाची 30 वर्षे पूर्ण झाल्यावर नियमितपणे ब्लड प्रेशर, शुगर आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी करा.
advertisement
8/9
हृदयविकार हा अचानक येणारा आजार वाटत असला, तरी त्याची तयारी शरीरात कित्येक वर्षे सुरू असते. म्हणूनच, आजच आपली जीवनशैली बदला आणि आपल्या हृदयाला दीर्घायुष्याची साथ द्या. लक्षात ठेवा, लवकर निदान हाच सर्वोत्तम उपचार आहे.
हृदयविकार हा अचानक येणारा आजार वाटत असला, तरी त्याची तयारी शरीरात कित्येक वर्षे सुरू असते. म्हणूनच, आजच आपली जीवनशैली बदला आणि आपल्या हृदयाला दीर्घायुष्याची साथ द्या. लक्षात ठेवा, लवकर निदान हाच सर्वोत्तम उपचार आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बीपीची औषधे थांबवल्यास खालील गुंतागुंत होऊ शकते:1. हृदयविकाराचा झटका (Heart Attack)रक्तदाब अचानक वाढल्याने हृदयाच्या धमन्यांवर ताण येतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.2. ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke)मेंदूतील रक्तवाहिनी फुटू शकते किंवा तिथे रक्ताची गाठ तयार होऊ शकते, ज्यामुळे अर्धांगवायू होऊ शकतो.3. किडनी निकामी होणे (Kidney Failure)किडनीतील सूक्ष्म रक्तवाहिन्या उच्च रक्तदाबामुळे खराब होतात, ज्यामुळे डायलिसिसची वेळ येऊ शकते.4. डोळ्यांच्या समस्याडोळ्यांतील पडदा (Retina) खराब होऊन दृष्टी जाऊ शकते.5.अँजायना:छातीत सतत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
advertisement
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement