9 नंबरची भानगड काय? भाजप, मनसे आणि शिवसेनेनंही का वापरला हा फॉर्म्युला?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Numerology - विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी जागावाटपा साठी 9 या नंबरला प्राधान्य दिले आहे. यामागचे कारण नेमके काय असू शकते, हे जाणून घेऊयात.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक - अंकशास्त्र ही हजारो वर्षांपूर्वीची आणि अनेक सभ्यता आणि संस्कृतींमधील अंतर्दृष्टीची एक प्राचीन आधिभौतिक प्रणाली आहे. सध्या सर्वत्र विधानसभेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असून आपण यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही या अंकशास्त्राचा प्रयोग झाल्याचे पाहू शकतो.
विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी जागावाटपा साठी 9 या नंबरला प्राधान्य दिले आहे. भाजपने पहिली यादी ही 99 उमेदवारांची जाहीर केली. मनसेने 45 जागा म्हणजेच 4+5 =9 तर शिवसेनाही 45 जागा म्हणजेच 4+5 =9 अशा पद्धतीने यादी जाहीर केली. यासोबतच नोव्हेंबर महिन्याचा काय अर्थ आहे, निवडणुकीच्या जागा दर्शविताना 9 या अंकाचे महत्त्व काय आहे, याबाबत अंकशास्त्र तज्ञ विभा घावरे यांनी माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, अंकशास्त्रात 9 हा अंक शक्तिशाली आहे. हा अंक पूर्णतेचे प्रतिनिधित्व करतो. ही जीवनाच्या सततच्या ओहोटीची ओळख आहे. 9 ही संख्या एकल-अंकी संख्यांपैकी शेवटची आहे. ज्याला अंकशास्त्रात कार्डिनल नंबर म्हणून ओळखले जाते आणि मूल्यात सर्वोच्च आहे.
तुम्ही जगलात आणि शिकलात तसेच तुम्ही तुमचे जीवन अर्थपूर्ण, जाणीवपूर्वक जगण्यात गुंतलेले आहात आणि तुम्ही फायदेशीर ध्येये ठरवत आहात, असे 9 क्रमांक दर्शवतो, असे त्या म्हणाल्या.
advertisement
ज्योतिषशास्त्रात, 9 क्रमांक हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. तसेच 9 या अंकाला महत्वाकांक्षा, उत्कटता आणि आक्रमकतेचा ग्रह यांच्याशी संबंधित आहे. मंगळ 9 या स्थानाला त्याची धार देतो, त्याच्यामध्ये एक ज्वलंत उत्कटता आणि महत्वाकांक्षा निर्माण करतो. मंगळ तुम्हाला इतरांचे संरक्षण करण्यास आणि जे योग्य आहे त्यासाठी लढण्यास उत्सुक बनवतो. या कारणांमुळे कदाचित सर्व पक्षांनी येत्या विधानसभेसाठी आपले ध्येय गाठण्यासाठी 9 शुभ अंकाचा वापर केला असावा, असे विभा घावरे यांनी सांगितले.
advertisement
तसेच तुम्ही कोणत्या प्रकारच्या अंकशास्त्र क्रमांकाची गणना करत आहात हे महत्त्वाचे नाही, सामान्य नियम असा आहे, की तुम्ही एक अंकी येईपर्यंत तुम्ही संख्या एकत्र जोडणे सुरू ठेऊ शकतात . जसे 11 आणि 22 देखील महत्त्वपूर्ण आहेत. प्रत्येक क्रमांकाच्या प्रोफाइलचा अर्थ, व्यक्तिमत्व, प्रभाव वेगळा असतो, असे त्या म्हणाल्या.
सूचना - ही माहिती अंकशास्त्र तज्ञ यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. याबाबत लोकल18 मराठी कोणताही दावा करत नाही.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
October 23, 2024 7:11 PM IST