Bigg Boss 19 : 'बिग बॉस'च्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं; घरातील सगळेच सदस्य नॉमिनेट; कारण काय?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss 19 Latest Update : 'बिग बॉस'चा नुकताच पार पडलेल्या भागात शहबाजवर केंद्र करण्यात आले होते. कॅप्टन अमाल मलिकच्या मदतीने घडलेली चोरीची घटनेचे प्रकरण थेट नामांकनापर्यंत पोहोचले.
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19'मध्ये नुकत्याच पार पडलेल्या मंगळवारच्या भागात घरातील सर्व सदस्यांनी शहबाज बदेशावर निशाणा साधला होता. संपूर्ण एपिसोडमध्ये शहबाज केंद्रस्थानी होती. कॅप्टन अमाल मलिकच्या मदतीने शहबाजने चोरी प्रकरण घडवून आणलं, जे नंतर एक मोठं मुद्दा बनलं आणि अखेर काहीसं असं घडलं की गोष्ट थेट नामांकनापर्यंत पोहोचली. 'बिग बॉस' अचानक सर्व सदस्यांना असेंबली रूममध्ये बोलावतात आणि नामांकनाच्या नियमांबद्दल विचारतात. त्यानंतर 'बिग बॉस' एका मोठ्या स्क्रीनवर घरच्यांची एक क्लिप दाखवतात, ज्यामध्ये सर्वजण नॉमिनेशनसाठी स्पर्धकांची निवड करताना दिसतात. संपूर्ण क्लिप पाहताच सर्व घरचे सदस्य टाळ्या वाजवायला लागतात, ज्यावर बिग बॉस त्यांची शाळा घेत म्हणतात,"ही टाळ्या वाजवण्याची गोष्ट नाही."
घरातील सदस्यांना मिळाली शिक्षा
बिग बॉस कॅप्टन अमाल मलिकला नॉमिनेशनचे नियम वाचायला सांगतात. अमाल नियम वाचताना सांगतो की, नामांकनावर चर्चा करणे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यानंतर 'बिग बॉस' घरातील सदस्यांची शाळा घेतात आणि म्हणतात की मागील 18 सीझनमध्ये आजवर असं कधीच घडलेलं नाही पुढे थेट सर्व घरच्यांना थेट घराबाहेर जाण्यासाठी नामिनेट करून टाकतात.
advertisement
घरातील सदस्यांना मिळाली दुसरी संधी
'बिग बॉस'पुढे घरातील सदस्यांना पुन्हा एकदा बोलावतात आणि त्यांना दुसरी संधी देतात. या आठवड्यातील काही सदस्यांना नॉमिनेशनपासून वाचण्यास सांगतात.
बिग बॉस घरच्यांना लोकशाहीच्या आधारावर दोन-दोन स्पर्धकांची नावे सांगायला सांगतात, ज्यांना ते वाचवू इच्छितात. मतांच्या आधारे नीलम गिरी, गौरव खन्ना, फरहाना भट्ट, तान्या मित्तल, आवेज दरबार, शहबाज बदेशा, जीशान कादरी, मृदुल तिवारी आणि कुनिका सदानंद यांना नॉमिनेशन प्रक्रियेपासून वाचविण्यात आले आहे. तर दुसरीकडे, नेहल चुडासामा, अशनूर कौर, प्रणित मोरे, बसीर अली आणि अभिषेक यांच्या डोक्यावर अजूनही नॉमिनेशनची तांगती तलवार आहे.
advertisement
अमाल मलिककडून खास अधिकार काढून घेतले
'बिग बॉस' सांगतात की, नियमांचं उल्लंघन केल्यामुळे अमाल मलिककडून कॅप्टन म्हणून मिळालेले विशेष अधिकार आता काढून घेतले गेले आहेत. अभिषेक, अशनूरला विचारतो की, तिने कुणाला मत दिलं, तेव्हा ती तान्या आणि गौरवचं नाव सांगते. त्याचवेळी बसीर याबाबतीत दुःखी होतो की सगळे त्याच्यासोबत फिरतात, पण कुणीही त्याला पाठिंबा देत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 10:01 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19 : 'बिग बॉस'च्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं; घरातील सगळेच सदस्य नॉमिनेट; कारण काय?