advertisement

Laziness : हिवाळा आहे म्हणून आळसावू नका, कमी हालचालींमुळे प्रकृतीवर होतील गंभीर परिणाम

Last Updated:

“व्यायामत लभते स्वस्थं दीर्घायुष्यं बलम् सुखम्,” असं चरक संहितेत म्हटलं आहे, म्हणजेच व्यायामामुळे आरोग्य, दीर्घायुष्य, शक्ती आणि आनंद मिळतो, पण शरीर कमी हालचाल करत असेल तर लठ्ठपणा आणि मधुमेह यासारखे अनेक आजार शरीराला घेरतात.

News18
News18
मुंबई : हिवाळा म्हणजे थंडी आणि अनेकदा थंडीमुळे आलेला आळसावलेपणा. थंडीत पांघरुणातून बाहेर पडणं नको वाटतं. काही वेळ असं वाटलं तरी यामुळे शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.
आळसावलेल्या जीवनशैलीमुळे मेंदूच्या वापरावर आणि शारीरिक हालचालींवर परिणाम होतो. कारण कमी शारीरिक हालचाली शरीराला आजारी पाडण्यासाठी पुरेशी आहेत. आयुर्वेदात कमी शारीरिक हालचाली म्हणजे शरीरासाठी धोक्याची घंटा मानली जाते.
आयुर्वेदानुसार, "अति योग, हीन योग आणि मिथ्या योग ही रोगाची मूळ कारणं आहेत." आयुर्वेदात, शरीराला कर्मयोगाचं साधन मानलं जातं. शरीराची हालचाल थांबली तर वात आणि कफ दोन्ही असंतुलित होतात. हालचालींच्या अभावामुळेही शरीरात असंतुलन निर्माण होतं.
advertisement
यामुळे कफ दोष वाढतो, वात दोष खराब होतो, पित्त दोषावर परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. शरीरात गंभीर आजार निर्माण करण्यासाठी हे पुरेसं आहे.
“व्यायामत लभते स्वस्थं दीर्घायुष्यं बलम् सुखम्,” असं चरक संहितेत म्हटलं आहे, म्हणजेच व्यायामामुळे आरोग्य, दीर्घायुष्य, शक्ती आणि आनंद मिळतो, पण शरीर कमी हालचाल करत असेल तर लठ्ठपणा आणि मधुमेह यासारखे अनेक आजार शरीराला घेरतात.
advertisement
एखादी व्यक्ती बराच वेळ बसून राहिली तर शरीरात चरबी जमा होते आणि शरीराची चयापचय क्रिया कमकुवत होते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे आजार होण्याची शक्यता वाढते.
दुसरं म्हणजे, बराच वेळ एकाच स्थितीत राहिल्यानं संधिवात आणि सांधेदुखीलाही आमंत्रण मिळतं. हाडांपासून स्नायूंपर्यंत कडकपणा त्रासदायक ठरू लागतो आणि हाडांचे सांधे सतत एकाच स्थितीत राहिल्यामुळे सांधेदुखीचाही त्रास होतो.
advertisement
तिसरं म्हणजे, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. चालण्यामुळे शरीरात रक्ताभिसरण वाढतं.
आणि रक्तासोबत ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचतो, पण असं झालं नाही तर रक्त आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रक्तदाबाचा आजार शरीराला वेढतो. रक्तदाबाच्या समस्यांमुळे हृदयरोग, नैराश्य आणि चिंता, पचनाचे विकार आणि कमकुवत प्रतिकारशक्तीचा धोका वाढतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Laziness : हिवाळा आहे म्हणून आळसावू नका, कमी हालचालींमुळे प्रकृतीवर होतील गंभीर परिणाम
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement