Dharashiv News : धाराशिवमध्ये "ऑपरेशन टायगर" अपयशी? वाघ अद्याप मोकाट!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Dharashiv News : यवतमाळचा वाघ धाराशिवच्या जंगलात रमल्याचं पहायला मिळतंय. लाखो रुपयाची उधळपट्टी झाली पण वाघ पकडण्याची मोहीम यशस्वी होईना, असं चित्र दिसत आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.
Dharashiv Tigers News : एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची (Operation Tiger) चर्चा सुरू असताना धाराशीवमध्ये खऱ्या खुऱ्या टायगरची चर्चा आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून फिरत असलेल्या वाघामुळे शेतकरी आणि नागरिक भयभीत झाले आहेत. यवतमाळहून आलेला हा वाघ अभयारण्यात रमला असून, आतापर्यंत 50 हून अधिक जनावरांची शिकार करत लाखोंची हानी केली आहे राज्याच्या राजकारणात टायगर मोहीम यशस्वी झाली असली तरी धाराशिवचा टायगर पकडण्याच्या मोहिमेला काही केला यश येईना.
टिपरेश्वरमधून वाघ धाराशिवच्या जंगलात
पाचशे किलोमीटरचे अंतर कापत यवतमाळच्या टिपरेश्वरमधून आलेला वाघ धाराशिवच्या जंगलात चांगलाच रमला आहे. पण दिवसेंदिवस शिकारीपोटी हा वाघ जंगल सोडून शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले करत आहे. एक दिवसाआड म्हणजेच त्याने आत्तापर्यंत 50 चा वर शेतकऱ्यांची जनावर फस्त केली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने वन विभागाच्या विशेष पथकाला हा वाघ पकडण्याचे आदेश दिले असले, तरी तो अद्याप हाती लागलेला नाही.
advertisement
वनविभागाचं आश्वासन
रोज नवीन युक्त्या करून वाघ पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषतः त्याला आकर्षित करण्यासाठी जंगलात शिकार ठेवली असून त्यावर कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जात आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता वन विभागावर विश्वास ठेवा लवकरच त्याला जेरबंद करू, असा विश्वास वनविभागाचे कर्मचारी व मोहिमेत सहभागी अधिकारी देत आहेत.
advertisement
डोंगर रांगात वाघ रमला
या वाघाने धाराशिवचे येडशी भूम परंडा आणि जामखेडचा काही भाग तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसरात वावर वाढवला आहे. दुष्काळी भागाचा या डोंगर रांगात वाघ रमला खरा पण त्याच्या या वावरामुळे शेतकऱ्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. शेतकरी जनावर सांभाळताना देखील हातात कुऱ्हाडी काठी घेऊनच फिरत आहेत त्याचा बंदोबस्त करावा व अशी मागणी करत आहेत. तर अधिकारी मात्र कोणी नेत्यांनी विचारू द्या, एकच उत्तर ठरलेलं असून लवकरच त्याला पकडून एवढेच बोलत आहेत.
advertisement
ऑपरेशन टायगर
दरम्यान, राज्याच्या राजकारणात "ऑपरेशन टायगर" यशस्वी झाल्याची चर्चा सुरू असताना, धाराशिवमधील या वाघाला पकडण्याचे ऑपरेशन कधी यशस्वी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 16, 2025 10:50 AM IST