Waqf Board ला निधी दिल्याच्या GR वर युटर्न! आता प्रशासन म्हणते, 'ही मोठी चूक...'

Last Updated:

महायुती सरकारने आज राज्य वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तातडीने 10 कोटीचा निधी जाहीर केला आहे. या संदर्भातला अल्पसंख्याक विभागाने शासन निर्णय (GR)ही जारी केला आहे. या सदंर्भातल्या बातम्या माध्यमांमध्ये झळकताच आता प्रशासनाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

वक्फ बोर्ड जीआर
वक्फ बोर्ड जीआर
Waqf Board Fund : महायुती सरकारने आज राज्य वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तातडीने 10 कोटीचा निधी जाहीर केला आहे. या संदर्भातला अल्पसंख्याक विभागाने शासन निर्णय (GR)ही जारी केला आहे. या सदंर्भातल्या बातम्या माध्यमांमध्ये झळकताच आता प्रशासनाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा परस्पर आदेश काढताही येत नाही आणि कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. पण हा आदेश प्रशासकीय पातळीवर निघाला आहे. त्यामुळे ती चूक तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती खास सुत्रांकडून मिळते आहे.
वफ्क बोर्डाच्या सर्वांगिन विकासासाठी महायुती शासनाने 20 कोटींचा निधी मंजूर केला होता.यामध्ये निवडणुकीपूर्वी जूनमध्ये अल्पसंख्याक कल्याण विभागाने औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाला दोन कोटी रुपये दिले होते आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता निकालानंतर, महायुती सरकारने वक्फ बोर्डाचे कामकाज आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी निधी मंजूर केला आहे.
advertisement
दरम्यान सरकारच्या या निर्णयाला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला होता. 'काँग्रेस सरकारने जे केले नाही ते महायुतीचे सरकार करत आहे. सरकार धार्मिक समाजाला खूश करत आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महायुती पक्षांना हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल,असा इशारा विहिंपचे कोकण विभागाचे सचिव मोहन सालेकर यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिला होता.
advertisement
विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. आता दोनच दिवसात महायुतीच सरकार स्थापण होणार आहे. सध्या एकनाथ शिंदे काळजीवाहू म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यात आता मुख्यमंत्रीपद जाहीर होण्यासाठी आणि सरकार स्थापनेआधी सरकारने घेतलेल्या या निर्णयाची आता चर्चा रंगली आहे. या निर्णयाने अल्पसंख्याकांना मोठा दिलासा दिला आहे.

जीआरवर प्रशासनाचे स्पष्टीकरण

advertisement
दरम्यान वक्फ बोर्डाला निधी दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आता या प्रकरणावर प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासकीय पातळीवर झालेली ही मोठी चूक आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अधिकाऱ्यांना असा परस्पर आदेश काढता येत नाही आणि कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. असे असतानाही हा आदेश प्रशासकीय पातळीवर निघाला. त्यामुळे ती चूक तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांची माहिती मिळतेय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Waqf Board ला निधी दिल्याच्या GR वर युटर्न! आता प्रशासन म्हणते, 'ही मोठी चूक...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement