Weather Alert: अवकाळी संकटानंतर धोका वाढला, महाराष्ट्रात पुन्हा उष्णतेची लाट, 48 तासांसाठी अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रावरचं अवकाळी संकट काही प्रमाणात कमी झालं आहे. मात्र, हवामान विभागाने पुन्हा महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसांपासून अवकाळी संकट घोंघावत आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह गारपिटीचं संकट देखील कायम आहे. मात्र, 21 मार्चला हवामानात पुन्हा काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान, तर काही ठिकाणी हलका पाऊस किंवा वादळी स्थितीचा अंदाज आहे. कोकण ते विदर्भ शनिवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
मध्य महाराष्ट्रातील हवामानात देखील शनिवारी बदल जाणवतील. पुणे आणि साताऱ्यात अवकाळी पावसाची शक्यता नाही. हवामान कोरडं राहील. तर कोल्हापूर, सांगली आणि सोलापुरात सोसाट्याच्या वारा आणि विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. सोलापुरात 48 तासानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तापमान 38 अंशांपर्यंत जाईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान, राज्यात 19-20 मार्चला विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपीटचा अलर्ट होता. 21 मार्चला पाऊस कमी होऊन बहुतेक भागात हवामान कोरडे राहील. परंतु, विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीटचा धोका कायम आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.







