कोकण रेल्वे मार्गावरील मत्सगंधा एक्सप्रेसमध्ये मोठा बदल,कुठून कुठे धावणार?पण कधीपासून?वाचा...

Last Updated:

Matsyagandha Express Running Till Panvel :एलटीटी येथे सुरू असलेल्या दुरुस्ती कामांमुळे मत्स्यगंधा एक्सप्रेससह काही कोकण रेल्वे गाड्या पनवेलपर्यंतच धावत आहेत. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

Konkan Railway
Konkan Railway
मुंबई : मध्य रेल्वेवरील पनवेल स्थानक येथे टर्मिनसशी संबंधित कामे सुरू आहेत. या कामांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या गाड्यांच्या प्रवासात बदल करण्यात आला आहे. नेमका कोणत्या ट्रेनमध्ये बदल असणार आहे आणि कधीपर्यंत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या बदलामुळे प्रवाशांचा संताप
मंगळूरु सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस 29 जानेवारीपर्यंत फक्त पनवेल स्थानकापर्यंतच धावणार आहे तसेच 31 जानेवारीपर्यंत ही गाडी पनवेलहूनच सुटणार आहे. या बदलामुळे कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक प्रवाशांना एलटीटीपर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त लोकल किंवा इतर वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.
advertisement
कोकण मार्गावरील गाड्यांबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम
दरम्यान दादर-रत्नागिरी पॅसेंजरप्रमाणेच इतर गाड्याही कायमस्वरूपी पनवेलपर्यंतच चालवल्या जाणार का अशी शंका आता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. कोरोनापूर्वी रत्नागिरी–दादर पॅसेंजर उशिरा धावू लागल्यानंतर ही गाडी दिवा स्थानकातच थांबवण्यात आली होती आणि तेथूनच परत पाठवली जात होती. कोरोनानंतर मात्र ही गाडी दादरपर्यंत न जाता कायमस्वरूपी रत्नागिरी-दिवा-रत्नागिरी अशीच धावत आहे.
advertisement
यामुळे इतर कोकण मार्गावरील गाड्यांबाबतही रेल्वे प्रशासन हळूहळू पनवेलपर्यंतच सेवा मर्यादित ठेवण्याचा विचार करत असल्याची भीती कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुरुस्ती व देखभालीचे काम सुरू असून 30 जानेवारीपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे नेत्रावती एक्सप्रेस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
कोकण रेल्वे मार्गावरील मत्सगंधा एक्सप्रेसमध्ये मोठा बदल,कुठून कुठे धावणार?पण कधीपासून?वाचा...
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement