Mumbai: मुंबईत भरधाव बेस्ट बसने 13 जणांना चिरडलं, 4 जणांचा मृत्यू; अनेक जखमी

Last Updated:

मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बस डेपोजवळ ही घटना घडली. कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना बेस्ट बसने 13 जणांना चिरडलं.

News18
News18
मुंबई: मुंबईत एकीकडे पालिका निवडणुकीसाठी धामधूम सुरू आहे. अशातच भांडुप रेल्वे स्थानकाजवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव बेस्ट बसने ४ ते ५ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये बसखाली सापडून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृताचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. या घटनेमुळे भांडुपमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बस डेपोजवळ ही घटना घडली. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे नोकरदार आपल्या घराकडे जाण्यासाठी बसच्या रांगेत उभे होते. त्याचवेळी अचानक एक बेस्टची बस क्रमांक MH 01 -CV- 6515 ही भरधाव वेगात आली आणि रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडून पुढे गेली.
advertisement
या बेस्ट बसने रांगेत उभ्या असलेल्या १३ जणांना चिरडलं. या दुर्घटनेमध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर घटनास्थळी आणखी प्रवासी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, बेस्टची बस ही नियंत्रणाबाहेर गेली होती. बस स्टॉपवर २० ते २५ जण रांगेत उभी होती. त्यावेळी ही बस आली आणि तिने रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडलं आणि पुढे निघून गेली. पुढे गेल्यावर ती एका विजेच्या खांबाला जाऊन धडकली. या बसचा वेग इतका होता की, धडकेनंतर विजेचा खांब ही  कोलमडला.  बस अनियंत्रित झाली होती, त्यामुळे हे सगळं घडलं असावं, असं प्रत्यक्षदर्शी दुकानदाराने सांगितलं.
advertisement
मुळात भांडुप परिसर हा प्रचंड रहदारीने गजबजलेला असतो. संध्याकाळच्या वेळी बस स्टॉपच्या परिसरात नोकरदार वर्ग हा घरी जाण्यासाठी स्थानकावर गर्दी करत असतो. त्याच दरम्यान एक ईलेक्ट्रिक एसटी बस नियंत्रणाबाहेर गेली आणि तिने रांगेत उभ्या असलेल्या लोकांना चिरडलं. घटनास्थळावर दृश्य हे भयानक होतं.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखक केलं आहे.
advertisement
बेस्टचा बसचालक पोलिसांच्या ताब्यात
पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्टच्या बसने एकूण १३ प्रवाशांना चिरडलं. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३ महिला आणि १ पुरूषाचा समावेश आहे. तर जखमींमध्ये ८ पुरूष आणि १ महिलेचा समावेश आहे. जखमींना राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बेस्ट बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  प्रथमदर्शनी बस चालकाबाबत कसलाही संशय नाही.  सीसीटिव्ही फुटेज तपासणार आहोत, त्यानंतर पुढे कारवाई केली जाईल, असं राजपूत यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: मुंबईत भरधाव बेस्ट बसने 13 जणांना चिरडलं, 4 जणांचा मृत्यू; अनेक जखमी
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement