Mumbai : मुंबईत येताना ट्राफिकचं नो टेन्शन! लवकरच खुला होतोय नवा एक्स्प्रेसवे, नेमका प्लॅन काय?
Last Updated:
Vadodara Mumbai Expressway : बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्गामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा प्रवास शक्य होणार आहे.
मुंबई : मुंबई आणि महामुंबई परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्ग लवकरच सुरू होणार आहे. हा महामार्ग 2026 मध्ये टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला केला जाणार असून यामुळे मुंबई शहरात प्रवेश करणे अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.
नव्या एक्स्प्रेसवेमुळे प्रवास होणार वेगवान
सध्या गुजरात आणि उत्तर भारतातून येणारी हजारो मालवाहू वाहने दररोज जेएनपीए येथे येतात. ही वाहने प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, घोडबंदर रोड, ठाणे-बेलापूर किंवा मुंब्रा-तळोजा मार्गांचा वापर करतात. त्यामुळे पालघर, वसई, विरार, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात कायम वाहतूक कोंडी पाहायला मिळते.
नवा एक्स्प्रेसवे कसा असेल?
ही समस्या दूर करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्णपणे नव्या आठ पदरी बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्गाची उभारणी सुरू केली आहे. हा महामार्ग महाराष्ट्रात तलासरीपासून मोरबे म्हणजेच बदलापूरजवळ पर्यंत एकूण 156 किमी लांबीचा असेल.
advertisement
या महामार्गाचा पहिला टप्पा तलासरी ते शिरसाड दरम्यान 79.8 किमीचा आहे. यातील तलासरी ते गंजाड हा भाग पूर्ण झाला असून उर्वरित काम फेब्रुवारी-मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसरा टप्पा शिरसाड ते मोरबे असा 76.88 किमीचा असून तो एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण होईल.
या महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची थेट जोड मिळणार आहे. भिवंडी जवळील आमने येथे दोन्ही महामार्गांमध्ये इंटरचेंज असणार आहेत. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि जेएनपीए बंदराकडे जाणारी वाहतूक अधिक वेगवान होणार असून प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 8:49 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुंबईत येताना ट्राफिकचं नो टेन्शन! लवकरच खुला होतोय नवा एक्स्प्रेसवे, नेमका प्लॅन काय?







