Toll Tax Rule Change : मोठा निर्णय; आता महाराष्ट्रातील या मार्गावर टोल वसुली बंद
Last Updated:
No Toll on Incomplete Expressways : वाहन चालकांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण बाहेर गावी जाताना कदाचित तुमच्या टोलचे पैसे वाचू शकतात.
मुंबई : टोलसंदर्भात वाहनचालकांसाठी दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने टोल नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले असून त्याचा फायदा एक्सप्रेस-वे प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार आहे.
जनतेच्या कष्टाचा पैसा वाचणार
नवीन नियमानुसार जर एखादा राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग पूर्णपणे तयार झालेला नसेल तर त्या मार्गावर एक्सप्रेस-वे दराने टोल आकारला जाणार नाही. यापूर्वी अपूर्ण काम असतानाही वाहनचालकांकडून जास्त दराने टोल वसूल केला जात होता. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती.
कधी पासून हा नियम लागू होणार?
15 फेब्रुवारी 2026 पासून हा नवीन नियम लागू होणार आहे. जर एखाद्या एक्सप्रेस-वेचा काही भागच वाहतुकीसाठी खुला असेल तर त्या खुल्या भागावर राष्ट्रीय महामार्गाच्या सामान्य दरानेच टोल आकारला जाईल. म्हणजेच वाहनचालकांना जादा टोल भरावा लागणार नाही.
advertisement
सरकारच्या मते या निर्णयामुळे अपूर्ण पण खुल्या असलेल्या रस्त्यांचा वापर अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. जुन्या महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होईल प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रदूषणही घटेल. हा नियम एक वर्षासाठी किंवा संबंधित एक्सप्रेस-वे पूर्णपणे सुरु होईपर्यंत लागू राहणार आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 11:35 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Toll Tax Rule Change : मोठा निर्णय; आता महाराष्ट्रातील या मार्गावर टोल वसुली बंद










